Thursday 6 October 2016

महाराष्ट्राचे निर्माते , मराठी साहित्याचे पहिले निर्माते आणि मातृसत्ताक संस्कृतीचे पुरस्कर्ते पुरोगामी राजघराणे : सातवाहन

महाराष्ट्राचे निर्माते , मराठी साहित्याचे पहिले निर्माते आणि मातृसत्ताक संस्कृतीचे पुरस्कर्ते पुरोगामी राजघराणे : सातवाहन
(सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. )
आजचा जो महाराष्ट्र आहे त्याची निर्मिती प्रथम कोणी केली असेल तर ते आहेत सातवाहन. हे सातवाहन (तेलुगू: శాతవాహన సామ్రాజ్యము ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांनी सुमारे ५०० राज्य केले असे इतिहासात नमूद केलेलं आहे. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र , कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. खरा महाराष्ट्र निर्माण करण्याचे कार्य तसेच प्राकृत मराठी निर्माण करण्याचे व मराठी कॅलेंडर शके सुरु केले ते याच घराण्याने.
नाशिक येथील पांडवलेणी ह्या बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली.
सातवाहन राजघराणे :
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. तसे तर सातवाहन हे पशुपालक होते. मात्र मुळचा हा पशुपालक समाज पुढे सम्राट अशोकाच्या बरोबर सैन्यात काम करू लागला तसेच पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही बौद्ध लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती. गनिमी काव्याने युद्ध कसे करायचे याचे तंत्र देखील याच कालखंडात जास्त प्रचलित झाले होते. यामध्ये प्रामुख्याने गौतमीपुत्र सातकर्णी यांनी त्याचा वापर करून आपल्या शत्रूला परास्त केले आणि प्रजेची कायम रक्षा केली.
महापराक्रमी गौतमीपुत्र सातकर्णी :
याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते. तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला. एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते. याने चातुवर्ण्यसंकर बंद केला व बौद्ध धर्मास उदार आश्रय दिला. (सौजन्य : साभार मराठी विकेपिडीया)
( आता काही जातिवंत यांची जात शोधतील आणि त्यांना त्यांच्या जातीशी जोडण्याच्या प्रयत्न करतील तसेच ते आमच्या जातीचे होते असे मिरवण्यास त्यांना सोईचे होईल. मात्र त्यांनी जे कार्य केले आणि योजना राबवल्या , चांगला राज्यकारभार केला त्याचा मात्र आदर्श घेणार नाहीत आणि तसे आचरण देखील करणार नाहीत.)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Friday 2 September 2016

शेतकऱ्यांचे शेतमालाला शाश्वत भाव कधी मिळेल..

शेतकऱ्यांचे शेतमालाला शाश्वत भाव कधी मिळेल..

शेतकरी आणि ग्राहक ने नेहमी दुखी दिसतात. याचे कारण म्हणजे भाव पडले तर शेतकरी दुखी होतात त्यावेळी बाजारतात शेतमाल एकदम स्वस्त असतो त्यावेळी ग्राहक खुश असतो. पण शेतमालाची कमतरता झाली कि भाव वाढतात मग त्याचा फायदा शेतकर्यांना थोड्या प्रमाणात होतो मात्र ग्राहक त्यामुळे दुखी होतात. आता हे दोन्ही घटक आनंदी ठेवण्यासाठी तसेच शेतमालाचे बाजार भाव कायम स्थिर राहण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दोघांना म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांना विन-विन परिस्थिती कशी निर्माण होईल यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे.
असंघटीत शेतकरी हा संघटीत झाला पाहिजे व कधी काय पिकवायचे आणि कोठे विकायचे याचे नियोजन झाले पाहिजे तरच शेतकर्यांना फायदा होऊ शकतो. जो शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी नाहीत्यांना त्रास होणार आहे त्यामुळे अश्या असंघटीत शेतकर्यांना आपल्या शेतीचे नियोजन आणि शेतमाल साठवणूक, विक्री, प्रक्रिया याचे नियोजन जमत नसल्याने त्याला फायदा होताना दिसत नाही. तसेच इकडे ग्राहकांना कधी स्वस्तात तर कधी एकदम महागात धान्य, भाजीपाला घ्यावा लागतो त्यामुळे सगळे नियोजन ढासळून जाते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी बाजार चालू करणे व त्यामधून शेतमाल विक्री करण्याकडे वळले पाहिजे तसेच शेतीपूरक व्यवसाय उभारणे आवश्यक आहे. आपल्या गाव-खेड्यात शेतमालावर प्राथमिक व द्वितीय प्रक्रिया होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शहरात आज मला कांदा रु. २०/ प्रती किलो तर इतर भाज्या रु. ३० प्रती किलो याच दराने वर्षभर राहिल्या तरी अडचण नाही. मात्र थोड्या प्रमाणात चढ-उतार झाले तर चालतील पण जास्त बदल झाले तर नियोजन कोलमडून जाते. त्यामुळे भाजीपाला साठवणूक करणे, तसेच भाजीपाल्यावर निर्जलीकरण ( सोलर ड्रायर) च्या सहाय्याने करून त्याची विक्री करण्याचे पर्याय आहेत.जास्तीचे उत्पादन होते त्यावेळी शेतमाल प्रक्रिया होणे हि काळाची आणि शेतकऱ्यांची गरज आहे. एकतर शेतीचे होणारे तुकडीकरण शेतीला मारक असताना शेतकर्यांना जर जगण्यासाठी आवश्यक उत्पादन आणि पैसा उपलब्ध झाला नाहीतर त्याचे पुढे कर्ज काढणे व त्याची पूर्तता झाली नाहीतर आत्महत्या करणे हेच पर्याय राहत असतील तर हा आमच्या व्यवस्थेचा पराभव नाही का ?? त्यामुळे आता शेतीमध्ये आम्हाला बदल करावे लागतील आणि बाजाराच्या गरजा बघून तसे उत्पादन, साठवणूक आणि प्रक्रिया याकडे वळले पाहिजे. यासगळ्या बाबी घडवण्यासाठी आता शेतकर्यांना एकटे राहून व स्वतंत्रपने शेतमाल पिकवून किंवा एकट्याने विकून जमणार नाही तर त्यासाठी संघटीत होऊन बाजाराची लढाई आता लढावी आणि जिंकावी लागेल.
बाजाराची लढाई लढणे तसे सोपे नाही हे मान्य कारण आजच्या सगळ्या बाजार समित्या किंवा बाजार पेठ हि व्यापारी नियंत्रित झाली आहे. त्यामुळे समूह शेती आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे मार्फत स्वतंत्र व पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याची आज गरज निर्माण झाली आहे तसेच सध्याच्या सरकार चे धोरण या उपक्रमास उपयुक्त असेच आहे. आता फक्त शेतकऱ्यांचे नावाने गळे काढणारे आणि सहानभूती दाखवणारे ग्राहक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांनी शेतकरी मित्रांना शहर, ग्रामीण भागात शेतमाल थेट खरेदी करून सहकार्य करावे तसेच शेतकर्यांना आता विनंती करावी वाटते कि तुम्ही आता एकटे राहणे सोडून द्या म्हणजे तुमचा फायदा होईल. तसेच सरकार ला विनंती कि एकट्याला मिळणाऱ्या योजना आणि अनुदान कमी करावे कारण त्याचा लाभ घेणारे नेमके कोण आहेत हे आता समोर आलेले आहे. त्यामुळे आगामी काळात योजना , मिशन किंवा आपले धोरण हे शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संस्था यानाच समोर ठेऊन करावे. यामुळे शेतकरी एकत्र येईल , संघटीत होऊन नियंत्रित शेती करेल ज्यामुळे उत्पादन, विक्री, प्रक्रिया याचे योग्य गणित साधून शेतकर्यांना फायदा होईल, शेतकरी वाचेल,

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Friday 12 August 2016

" या भूमीवर पुन्हा एकदा जन्म घेवून ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी अंतिम इच्छा आहे."- क्रांतिवीर संगोळी रायन्ना

" या भूमीवर पुन्हा एकदा जन्म घेवून ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी अंतिम इच्छा आहे."

थोर राष्ट्रभक्त व क्रांतिकारक संगोळी रायन्नांना फाशी देण्यापुर्वी त्यांनी प्रकट केलेली ही अंतिम इच्छा...

१५ ऑगस्ट रोजी या क्रांतिकारक याची जयंती आणि २६ जानेवारी रोजी स्मृतिदिन असतो हाही एक विलक्षण योगायोग आहे आणि तो केवळ संगोळी रायन्नां यांचे वाट्याला यावा हे विशेष आहे. इतिहासाच्या पानात अनेक थोर क्रांतीकारक दाबले गेले आहेत. यामध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषबाबू, बाबूगेणू आदी बोटावर मोजण्याइतपत काही मोजक्या क्रांतिकारक महावीरांची नावे वगळली तर आजवर आपणास देशाकरिता व स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राणाहुती देणाऱ्या अनेक महावीरांची नावे सुध्दा माहित झाली नाहीत याची खंत वाटते.

माहित आहेत त्याव्यतिरिक्त अनेक क्रांतिवीर होऊन गेले आहेत. यामध्ये सम्राट महाराजा यशवंतराव होळकर, उमाजी नाईक, संगोळी रायन्ना, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, झलकारीबाई , बाबू गडारी अशा पुष्कळ अज्ञात महावीरांची नावे व त्यांचा इतिहास आपणापासून कोसो दूर आहे...

आजपर्यंत जे महापूरूष उपेक्षीत राहीले त्यामध्ये क्रांतीवीर संगोळी रायन्नांचा फार वरचा क्रमांक लागतो. आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा " जयंती" तसेच "प्रजासत्तादिन हा स्मृतीदिन" असणारा जगातील एकमेव भाग्यवान क्रांतीकारक म्हणजेच रायान्ना. म्हणूनच १५ आँगस्ट हि भारताच्या स्वातंत्र्यदिना सोबतच क्रांतीवीर रायन्नांची जयंती सुध्दा आहे.

@ संगोळी रायन्ना यांचे क्रांतिकारक कार्य @

१५ ऑगस्ट १७९८" रोजी कर्नाटकातील एका गरिब धनगर कुटूंबात रायन्नांचा "जन्म" झाला. ते लहानपणा पासूनच साहसी व काटक वृत्तीचे होते या गुणांचा फायदा त्यांना इंग्रजांविरुद्ध लढताणा झाला...
ब्रिटीश सरकारने कित्तूर म्हणजेच कर्नाटकची राणी चेन्नम्मा हिचे दत्तक वारसा नामंजूर करून तिचे संस्थान खालसा केले. त्यामुळे स्वाभिमानी राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध युध्द पुकारले. त्यावेळी चेन्नम्माचा सेनापती या नात्याने 'रायन्ना' या युद्धाचे नेतृत्व करत होते. स्वतः राणी सुध्दा घोड्यावर स्वार होवून इंग्रजाविरूध्द लढाईत सहभागी झाली होती. तुंबळ युध्द झाले रायन्नांनी पराक्रमाची शर्थ केली परंतू दुर्दैवाने चेन्नम्मास कैद केले गेले त्यातच तिचा मृत्यू झाला त्यामुळे रायन्नास पराभवास तोंड द्यावे लागले.
त्यानंतर पराभवाने खचून न जाता रायन्नांनी कष्टकरी, गोरगरीब व सामान्य जनतेतून पुन्हा सैन्य उभे केले अन् चांगले हात धुवून इंग्रज सरकारच्या मागे लागले. त्यांनी गणिमी काव्याने हल्ले करून इंग्रज सरकारवर चांगली जरब बसवली. सरकारी मालमत्तेवर हल्ले करणे, ब्रिटीशांचा खजिना लुटून गोरगरिबांना वाटणे, इंग्रज सरकारच्या बळावर गरिब जनतेला छळणाऱ्या सावकारांना झोडपून त्यांच्या ताब्यातील गरिब जनतेच्या जमिनी सोडवणे आदी कामे करून रायन्नांनी सामान्य जनतेस स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यास प्रोत्साहित केले..
रायन्नांनी अविरत सहा वर्ष झुंज देवून ब्रिटिश राजवटीस सळो कि पळो करून सोडले.

यन्नांनी ब्रिटीश राजवटीविरोधात पुकारलेल्या बंडास जनतेचा उदंड पाठींबा मिळाला त्यांची ही चळवळ कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व आंधप्रदेशातही पसरू लागल्याने भारतील ब्रिटीशांचे सरकारचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. ब्रिटीशांनी रायन्नांची चांगलीच धास्ती घेतली. ब्रिटीश सरकारला आपले राज्य टिकवण्यासाठी ऐन केन प्रकारे रायन्नांना जेरबंद करणे अगत्याचे झाले. म्हणून त्यांनी रायन्नास पकडून देणाऱ्या करिता मोठे बक्षिस जाहिर केले..
अखेर फितुरीने घात केला. पैश्याच्या अमिषाला बळी पडणाऱ्यांनी रायन्नांचा घात केला.भारताच्या स्वातंत्र्याकरिता झगडणारा एक वाघ फितूरीने कैद केला गेला. "२६ जानेवारी १८३१" रोजी बेळगाव जिल्ह्यातील, खानापूर तालुक्यातील नंदगड या गावी एका वडाच्या झाडाला रायन्नांना 'फाशी' दिली. ते वडाचे झाड आजही आहे त्याखालीच रायन्नांची लहानशी समाधी देखील आहे.

"संगोळी रायन्ना सारखा शुरवीर पुत्र आमच्या पोटी जन्मास यावा" असे नवस बोलून अनेक नववधू आजही त्या वडाच्या झाडास एक लहान पाळणा बांधतात. रायन्ना फाशी गेले पण जाता जाता असंख्य क्रांतीच्या मशाली पेटवून गेले. रायन्नांच्या जिवनावर एक कन्नड चित्रपटही आहे तसेच गेल्या वर्षी बंगळुरू येथील मोठ्या रेल्वे स्थानकाला संगोळी रायन्नांचे नावही दिले आहे.
(सौजन्य शैलेश काळे)

@ १५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. हा मेसेज जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहचवावा @

@ पुण्यात देखील आपण १५ ऑगस्ट २०१६ रोजी संगोळी रायन्ना यांचे जयंती निमित्य अभिवादन करणार आहोत. तरी सर्वांनी सकाळी १०.०० वाजता विश्वरत्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक, सारसबाग येथे उपस्थित राहावे.@

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

महाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांची वाट लावणारे नेमके कोण ??

हाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांची वाट लावणारे नेमके कोण ??
महारष्ट्रात दुग्ध क्रांती झाली ती सहकारी दुग्ध संस्था उभ्या राहिल्या म्हणून. सहकार क्रांतीमुळे दुध क्रांती निर्माण झाली असेही म्हणता येईल. या राज्यात कृषि व्यवसायाला पूरक असा डेअरी व्यवसाय असल्याने तसेच दुध देणारे पशुधन शेतीला शेनखत देण्यास उपयुक्त असल्याने खरे तर चालना मिळाली. हे घडण्यास जसे दूरदृष्टी असणारे नेतृत्व कारणीभूत होते तसेच या राज्यातील प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी आणि दुध उत्पादक महत्वाचा होता. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात दुग्ध उत्पादन होऊ लागल्याने सर्व सामान्य कष्टकरी, कामगार आणि गरीब माणूस सुद्धा आपल्या कुटुंबाला आणि मुला बाळांना दुध देऊ लागला होता. देशात दुध उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या राज्याच्या पंक्तीत महाराष्ट्र जाऊन बसला तो सर्वांच्या कष्टाने आणि मेहनतीने तसेच या राज्यात दूरदृष्टी असणाऱ्या व निस्वार्थी नेतृत्वामुळे.
मात्र काळ बदलला तसे नेतृत्व बदलत गेले. सहकार उभा करणाऱ्या पिढीचे नेतृत्व बाजूला झाल्यावर आणि त्यांचे पुढचे पिडीचे शिलेदार राजकारणात आले ज्यांना आपल्या पूर्वजांच्या कर्तुत्व, त्याग आणि निस्वार्थी भावना या सर्व बाबींना फाटा देऊन सहकार क्षेत्राची पुरती वाट लाऊन टाकल्याचे सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. राज्यात सर्व विभागात मिळून एकूण २७४६२ सहकारी दुध संस्था होत्या. मात्र स्वार्थी राजकारणी यांची वक्रदृष्टी यावर पडली आणि स्वताचे दुध संघ, डेअरी काढून सहकारी संस्थाना खड्यात घातले गेले. आज कागदोपत्री फक्त ११५९४ संस्था जिवंत आहेत. तसेच ७४४१ संस्था बंद असून अवसायानात निघालेल्या संस्थांची यादी आहे ८४२७. जर आपण या संस्था यांचे ऑडीट केले स्थापनेपासून तर एक समान धागा दिसेल कि आज ज्यांचेकडे खाजगी डेअरी आहेत त्यापैकी अनेकजन या सहकारी संस्थामान्ध्ये संचालक, चेअरमन आणि विविध पदावर काम करत होते असे दिसेल.
सहकरी डेअरी सामान्य शेतकरी आणि दुध उत्पादकाला त्याचे कुटुंब उत्तम चालावे यासाठी फार उपयुक्त होत्या. मात्र जाणीवपूर्वक आपल्या खाजगी संस्था मोठ्या व्हावेत याचा विचार करून या सहकारी संस्था बुडवल्या किंवा अवसायानात काढल्या असे अनेक लोक बोलत आहेत. विभागीय, जिल्हा आणि तालुका सहकरी संघ होते त्याचीसुद्धा अशीच वाट लावली आहे. तसेच राज्यात दुग्ध विकास व्हावा यासाठी विविध अनुदान दिली गेली आणि योजना राबवल्या गेल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील योजना आहेत :
१. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गतइंटिग्रेटेड डेरी फार्म प्रकल्पासाठी निवडलेल्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांची यादी
२. स्वच्छ दूध उत्पादन योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत मंजूर निधी आणि राज्य सरकार मार्फत वितरीत झालेला निधी
३. रा.कृ.वि.यो. अंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची माहिती
४. वेगवर्धक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी दुध संघाची यादी
या योजना राबवल्या गेल्या आहेत. हि फक्त प्रातिनिधिक स्वरूपातील नावे आहेत. आता या योजनाचे लाभार्थी कोण आहेत हा खरा आणि महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर जे हुशार आहेत त्यांना नक्कीच सापडेल. ज्यांनी सहकाराची आणि सहकारी दुध संस्था यांना मोडून आपल्या खाजगी संस्था उभ्या केलेले नतदृष्ट राजकारणी तर नाहीत ना ? राजकीय टाकत आणि मिळवलेली पदे यांचा दूरउपयोग करून सरकारी निधीतून आपल्या खाजगी संस्था कश्या मोठ्या केल्या तसेच सहकारी संस्था नेमक्या कोणी आणि का बुडवल्या त्याचे उत्तर नक्कीच आपल्याला सापडेल. स्वार्थी आणि संधी साधू लोकांनी या संस्थाना अक्षरशा समुद्रात बुडवले असे म्हणता येईल. सामान्य लोकांना भावनिक करून राजकारण करणाऱ्यांचे पितळ मात्र उघडे पडले नाही किंवा सामान्य जनतेला सुद्धा आपला घात कसा आणि कोणी केला हे समजलेच नाही. मात्र आता दुध संस्था, सहकारी बँका आणि साखर कारखाने कोणी बुडवून खाल्ले हेही समोर आलेले आहे. त्यामुळे आता अश्या दृष्ट लोकांना लोकांनी घरी पाठवले तरच अजून जिवंत असलेल्या संस्था वाचतील अन्यथा उरलेल्या सुद्धा पाण्यात जातील....
( वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत असेल)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Monday 8 August 2016

स्वयंम घोषित गोरक्षक हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत....

स्वयंम घोषित गोरक्षक हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत....
सरकार ने गो हत्या बंदी आणली आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्याचबरोबर गोरक्षक नावाची एक पिल्लावळ जन्माला आली. देशात आणि राज्यात गोरक्षक यांनी केलेले अत्याचार मग ती दलित यांना, मुस्लीम यांना केलेली मारहाण असो किंवा कोणाला मारले असेल अश्या घटना सगळीकडे वाढत असल्याचे दिसून आल्या. अनेक शेतकरी त्यांचेकडे भाकड झालेल्या किंवा वय झालेल्या किंवा दुष्काळामुळे स्वतःला जगणे मुश्कील झाले आहे ते आपली जनावरे विकत होते त्यांना सुद्धा त्रास झाला कारण कोणी गाई विकत घ्यायला तयार नाही. तसेच ज्यांचा गाई च्या कतली करून त्याचे मांस विक्री करणे हा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचे व्यवसायावर गंडांतर आले. म्हणजे एक भयंकर समस्या अनेक लोकांच्या पुढे उभी राहिली ती अनेकांचे पोट भरण्याचे साधन हिरावून घेतले गेले तर अनेकांना आपल्या गाई विकता येत नव्हत्या.
अनेक ठिकाणी गाई विकायला घेऊन जाणार्या शेतकरी, चालक किंवा ज्याला विकायला घेऊन जात आहेत त्यांना प्रचंड मारहाण किंवा अनेक ठिकाणी मारहाणीत मृत्यू झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा हल्लाबोल चालू होता त्यावेळी कोणाचे त्या प्रश्नाकडे लक्ष जात नव्हते. खुद्द प्रधानमंत्री सुद्धा या घटनांकडे लक्ष देत नव्हते. मात्र परवा त्यांनी वक्तव्य केले कि मला गोळ्या घाला पण दलित लोकांना मारू नका याबद्दल त्यांचे आभार जर त्यांचे म्हणणे खरे आणि आपल्या अन्त्कारनातून आले असेल तर नक्कीच आभार. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यात गोरक्षक फारच आक्रमक होत होते आणि त्या राज्यात घटना जास्त वाढत होत्या. प्रधानमंत्री म्हणाले त्याप्रमाणे ८०% गोरक्षक हे बोगस होते याचा नुकताच खुलासा झाला आहे. यामध्ये गोरक्षक नावाने गुंड लोक त्या गाड्या कडून हप्ते गोळा करायचे. त्या लोकांनी गुंड पाळले होते जे यांचेकडून पैसे वसूल करत होते. एका जनावरामागे २०० ते ३०० रुपये किंवा एका ट्रक मागे २०००० रुपये पर्यंत उकळत असत.
गोरक्षक नावाने वावरणारे मानवभक्षक नेमके काय करत होते ??? तर ते पैसे वसूल करत होते. मग गाई किंवा जनावरे भरून जाणारे ट्रक यांना कसा माहित असायचा हे माहित झाले तेंव्हा तर हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत हे नक्कीच झाले. जे गाई विकायचे ते हे गोरक्षक होते मग गाई विकल्या कि त्यांचे पाळलेल्या गुंडाकडून त्या ट्रकला आडवायला सांगून त्याकडून पैसे वसूल करत असत. जे देत नव्हते त्यांना मारहाण केली जायची तसेच या गोरख धंद्याला कवच म्हणून त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद याचे कवच घातले होते. आपल्या गोरक्ष धंद्या साठी दलित, हिंदू आणि मुस्लीम अशी उभी फुट पाडणारे हे धर्म मार्तंड आपल्या धंद्यासाठी आपण काय करत आहोत याचा विचार सुधा करत नाहीत. धर्मवेडे किंवा धर्मंद असणे त्या त्या देशासाठी किती धोकादायक असते ते पाकीस्थान , सिरीया यावरून दिसून येते. गोरक्षक हे ना धर्म प्रेमी आहेत किंवा गोवंश रक्षण करायचे आहे. त्यांना त्याचे आडून आपला धंदा वाढवायचा असल्याचे दिसते. खरच हे गोरक्षक होते तर त्यांनी मग शेतकरी आणि गरीब मजूर यांचेकडे भाकड झालेल्या गाई यांना स्वतः सांभाळायला हवे होते किंवा त्या गाई स्वतःकडे ठेऊन त्यांची चारा आणि पाणी याची व्यवस्था करायची होती, पण तसे होताना दिसत नाही. वस्तुतः कोणताही शेतकरी किंवा ज्याचेकडे गाई किंवा कोणतेही जनावर असेल तर ते खाटिक किंवा कोणाला विकायला मनावर फार मोठा दगड ठेऊन ते विकावे लागते कारण ते जनावर त्यांचे कुटुंबाचा एक भाग असते. पण स्वतः जगणे मुश्कील झालेला शेतकरी मग इलाज नसतो त्यावेळी पशुधन विकून टाकतो. मात्र अश्या बोगस गोरक्षक यामुळे शेतकरी, कामगार तसेच त्यावर ज्यांची पोटे चालत होती त्यांचे जगणे मुश्कील करून टाकले.
त्यामुळे आजूबाजूला अशे किती संधिसाधू आणि बोगस गोरक्षक आहेत हे तपासून पाहिले पाहिजे. तसेच त्यांना आता रोखले पाहिजे ते म्हणजे सर्व समाज व्यवस्थेने अन्यथा या देशात अशांतता माजल्या शिवाय राहणार नाही. तसेच जातीय, धार्मिक तेढ वाढवून हे महाभाग आपला धंदा अजून तेजीत आणतील. प्रधामंत्री यांचे म्हणणे त्यांनी आणि देशातील प्रत्येक राज्यातील सरकार यांनी अश्या भोंदू आणि बोगस गोरक्षक यांनी वेळीच रोखावे जेणेकरून देश जो भलत्याच दिशेला घेऊन जाणारे आणि मानवभक्षक असणारे उद्या देशात काय काय करून ठेवतील याची कल्पना देखील करता येत नाही. ( आज तक वर याचे स्टिंग झाले असून बोगस गोरक्षक यांची पोल खोल झाली आहे)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Tuesday 26 April 2016

नागराज मंजुळे यांचा "सैराट" चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार....

नागराज मंजुळे यांचा "सैराट" चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार....

खरे तर नागराज मंजुळे हे ग्रामीण भागातील दिग्दर्शक आहेत ज्यांना चित्रपट या क्षेत्रातील कोणताही वारसा नव्हता. त्यांनी पाठीमागे जे काही चित्रपट तयार केले त्यामध्ये ग्रामीण जीवनातील अंतरंग तसेच वास्तव परखड पणे मांडले आहे. या मध्ये मग पिस्तुल्या, फैन्द्री यासारखे उत्तम चित्रपट देऊन समाज व्यवस्थेमधील ग्रामीण भागातील जातीय वास्तव तसेच मानवी मनाने केलेले प्रेम याला गावात काय मिळते हे दाखवले आहे.
नागराज ने अनेक चित्रपटातून या व्यवस्थेला जी चपराक दिलेली आहे त्यामधून या व्यवस्थेमध्ये बदल व्हावेत असी त्याची कामना आहे. नागराज चा चित्रपट असतो तो काहीतरी वेगळे घेऊन येणारा. तो स्वतः कथा लिहितो आणि त्यामध्ये वास्तव असणारे तसेच ग्रामीण जीवनात घडणारे किंवा अनुभवलेले वास्तव अधिक ठळक असते. आता येणारा सैराट सुधा नव्या दमाचा नवा सिनेमा ज्या मध्ये नेहमी प्रमाणे ज्या अभिनेता किंवा अभिनेत्री यांची कोणालाही ओळख नाही अश्या नव्या दमाच्या जोडीला जी ग्रामीण भागातील आहे ती म्हणजे ठोसर आणि रिंकू राजगुरू तसेच फैन्द्री मधील झब्या आणि डब्या आहेत या चित्रपटामध्ये ज्या मध्ये प्रेमकथा आहेच पण सामाजिक जीवनातील गावातील अनेक संघर्ष, जात आणि इतर बाबी मस्त गुंफल्या आहेत . खरे तर महेश मांजरेकर मध्ये म्हणाले होते कि मराठी चित्रपटाला मिळणारे अनुदान बंद करावे कदाचित त्यामागील हेही कारण असू शकते कि नागराज सारखे दिग्दर्शक जे ग्रामीण भागातील असून चांगले चित्रपट तयार करून त्यांना स्पर्धा करू लागलेत त्यामुळे कदाचित त्यांचे मार्ग बंद करावेत हा केविलवाणा प्रयत्न असू शकतो. पण तसे काही होईल असे वाटत नाही कारण गुणवत्ता असलेले लोक कितीही आणि काहीही केले तरी पुढे जाणार.
अजय-अतुल या जोडीचे संगीत याला लाभले असून अतिशय सुंदर आणि ठेका धरायला लावणारी गाणी आहेत. तसेच विशेष म्हणजे हॉलीवूड चे संगीत यामधील गाण्याला हॉलीवूड मध्ये जाऊन घेतले आहे. जे कि मराठी म्हणा किंवा आतापर्यंत कोणत्याही चित्रपट मध्ये झाले नव्हते. तसेच नागराज याचे विशेष अभिनंदन कि ग्रामीण भागात दडलेले कलाकार शोधून ते आणि त्यांची कला सर्वांसमोर आणत आहे तसेच कलाकार हा कोणत्याही एकाच जातीत जन्माला येत नाही तर कलेला जात नसते आणि कलाकार शहरातच जन्माला येतो त्यालाही छेद देत करमाळा जिल्हा सोलापूर भागातील कलाकार निवडून चित्रपट हा सर्वांसाठीचे मनोरंजन आणि प्रबोधन याचे मध्यम असल्याचे या चित्रपटातील संदेशाने अधोरेखित होते. तरी सर्वांनी नक्कीच आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन सैराट हा चित्रपट पहावा आणि सैराट व्हावे.....
नागराज मंजुळे यांना या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच आगामी काळात चांगल्या कलाकृती जन्माला घालोत याही शुभेच्छा.......

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१
vijaygophaneblogspot.com
vijay.gophane@gmail.com

Friday 22 April 2016

देशातील मिडीयाला अजून शहाणपण कधी येणार ??

देशातील मिडीयाला अजून शहाणपण कधी येणार ??
आपला मिडिया ज्यामध्ये खासकरून काही बातम्या देणारे न्यूज चैनल अजून किती बालीशपणा करतात तेच दिसून येते. एकतर चैनल वाले तयार होऊन झालेत १२ ते वर्ष. जर मानवी वयाच्या आणि समाज याबातीत बोलायचे झाले तर अगदी लहान बाळाचे वय जसे असते तसे इथल्या न्यूज मिडियाचे वय आहे. हा बालीशपणा अनेक प्रकरणातून आणि प्रसंगातून तसेच त्यांनी दाखवलेल्या बातम्यातून दिसून येईल. या देशातील संरक्षण विषय बाबींना हात घालून सगळे उघडे करून इतर शत्रू देशांना याचा फायदा होईल याचा विचार न करता माहिती देणारा इथला मिडिया. तसेच देशात जेंव्हा मुंबई मध्ये अतेरिकी हल्ला झाला होता त्यावेळी थेट प्रक्षेपण दाखवून शत्रूला आपली रणनीती बदल करायला आणि हल्ले करायला जणू मदत करत होते के काय असा प्रश्न पडत होता.
आजही मिडिया आपल्या वागण्यात काहीच बदल करण्यास तयार नाही असे वातावरण दिसते. या देशात अनेक महत्वाच्या समस्या असताना हे पैसे घेऊन कशाला जास्त दाखवतील याचा काही नेम नाही. जर आपण नीट पाहिले तर भांडवलदारांचा हस्तक किंवा त्यांचीच पिल्लावळ असलेला हा मिडिया या देशातील वातावरण असहिष्णू करण्यास तितकाच जबादार आहे. बातमी च्या नावाखाली काहीही दाखवत असतात हे लोक. मागे राष्ट्रभक्ती यावर अनेक दिवस चर्चा घडवून आणि त्यामधून जाती आणि धर्मात वाद लावून दिले होते. तर धर्म हेतर कायम यांना वाद लावून त्याचे प्रक्षेपण करणे आणि लोकांना दुसरा कोणताही विचार करू द्यायचा नाही हे यांनी पक्के ठरवून घेतले आहे. (काही चैनल चांगले असतील पण खूप कमी आहेत)
आजच्या घडीला देशात जर पाहिले तर लोकांची मने तयार करणे किंवा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे कार्य हाच मिडिया करतो. त्यामुळे मिडिया माणसाला चालवायला लागल्याचे चित्र दिसते. यामुळे माणूस स्वतः जास्त विचार करत नाही आणि तो या मिडिया च्या भरोश्यावर विसंबून राहतो. नेमका याचाच फायदा उचलला जातो आणि दलाल निर्माण होऊन भांडवलदारांचे हित साधले जात असल्याचे दिसते. चांगले काम करणारे लोक असतील किंवा नेते असतील किंवा विषय असतील किंवा खर्या समस्या असतील इकडे हे फारसे लक्ष देत नाहीत मात्र या देशात मशीहा निर्माण किंवा जन्माला घालायचे काम हा इथला मिडिया करत आहे. लोकशाहीचा हा चौथा स्थंभ नक्की योग्य काम करतो आहे किंवा नाही याबाबत त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच वेळ आलेली आहे. कोणाची तरी तळी उचलून आणि त्याला प्रचंड प्रसिद्ध करायचे आणि चांगल्या लोकंकडे दुर्लक्ष्य करायचे हे एक यांचे षड्यंत्र आहे.
समाजात जागृती करून लोकशाही आणि मानवी मूल्य यांना बळकट करणे गरजेचे असताना हा मिडिया नेमके याचे उलट काम करताना दिसतो. या मिडिया इथल्या समाज व्यवस्थेमधील अनेक अश्या जमाती आहेत ज्यांच्या समस्या भयंकर आहेत तिकडे लक्ष्य द्यायला अजिबात वेळ नाही. तसेच हे लोक अंधश्रद्धा पसरवण्यास सुधा मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. धार्मिक आणि दैवी गोष्टीना खतपाणी घालून लोकांचा बुद्धिभेद केला जातो तसेच लोकांना मानसिक गुलाम करायचे काम इथला मिडिया करत असतो. मिडिया काही वर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो मात्र आता सोशल मिडिया मुळे लोकांच्या काही वेदना आणि समस्या तसेच काही वास्तव समोर येते तसेच स्वस्तात मिळणारा हा मिडिया आहे. मात्र यावर सुधा अनेक मेसेज जसे कि हा मेसेज पुढे २१ लोकांना पाठवा लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि आमचे पण भयाड लोक लगेच पाठवतात पुढे घंटा चांगली बातमी येत नाही आणिनंतर देतात नशिबाला दोष. मिडिया हा देशातील प्रत्येक घटकांचे प्रश्न मांडणारा, प्रत्येकाचा प्रतिनिधी म्हणून असला पाहिजे जो देशात विभागणी न करता उलट एकता आणि एकात्मता वाढेल तसेच सत्ताधारी पक्षावर दबाव निर्माण करेल तसेच देशात घडणाऱ्या चांगल्या आणि सकारात्मक बाबींना पुढे आणून देशाची प्रगती होईल याकडे लक्ष देईल.
अनेक मिडिया चैनल वर काही कार्यक्रम असतात त्यापैकी डिबेट हा एक कार्यक्रम असतो ज्यामध्ये विविध पक्ष आणि संघटना यामध्ये कोंबड्याची झुंज जशी लावली जाते तशी इथे लावून दिली जाते. या देशातील व्यवस्था परिवर्तन झाले पाहिजे आणि जुन्या चुकीच्या बाबी बंद झाल्या पाहिजेत यासाठी मात्र जास्त प्रमाणात हे लोक काम करत नाहीत. यांनी किमान आता तरी बालीशपण सोडून देऊन चांगले कार्य हाती घ्यावे. मिडीयाने अगोदर स्वतः काही कोड ऑफ कंडक्ट घालून घ्यावा आणि तेंव्हाच दुसर्याला नितीमुल्य शिकवावी अन्यथा दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशे म्हणावे लागेल......

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Wednesday 6 April 2016

आयपीएल महत्वाचे आहे कि लोकांना पिण्याचे पाणी ?? भाजप चा मुखवटा नेमका कोणता आहे??

आयपीएल महत्वाचे आहे कि लोकांना पिण्याचे पाणी ?? भाजप चा मुखवटा नेमका कोणता आहे??

एकतर महाराष्ट्रात १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ पडला असताना ४० लाख लिटर पाण्याची फुकट उधळपट्टी होणार आहे. इकडे मराठवाडा आणि विदर्भातील , पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे दुष्काळामुळे होरपळून निघत आहेत मात्र चंगळवादी लोक जे भारतात राहत नाहीत तर इंडिया मध्ये राहतात त्यांना याचे काहीच सोयर सुतक नसावे यापेक्षा काय वाईट ते. दिवाळी मध्ये जर एखाद्याच्या शेजारील घरात जर मयत झाले असेल आणि आपण त्याचे घरात झाले आहे माझ्या नाही म्हणून खुशाल फटाके वाजवणार असो तर आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत असेच म्हणावे लागेल. त्यांचे दुखात जर सामील होता आले नाही तर किमान त्यांचे जखमांवर मिट तरी चोळू नये. जर एवढाच पैशाचा माज असेल तर विकत आणावे पाणी ३ रुपया लिटर ने दुसऱ्या राज्यातून किंवा इतर ठिकाणी मिळेल तिथून.
जर या वेळचे सामने जर दुसऱ्या राज्यात भरवले तर खूपच चांगले होईल ज्या राज्यात पाण्याची चांगली व्यवस्था आहे. मात्र अश्या ठिकाणी कॉंग्रेस चे शुक्ला आणि भाजपच्या मंडळी सगळा विरोध विसरून बरे एक होतात. या राज्यात दुष्काळ आणि नापिकी मुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत तर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत त्यांना मदतीसाठी पुढे येणारे किती जन आहेत. आमचे मुख्यमंत्री तर " भारत माता कि जय" म्हणण्यात दंग आहेत मात्र या भारत भूमीच्या शेतकरी राजाला आत्महत्या करावी लागतेय तिकडे लक्ष्य द्यायचे आणि त्यांची तहान कशी भागेल यावर लक्ष्य देण्या ऐवजी सगळ्यांचे लक्ष भलतीकडेच वळवत आहेत यासारखे वाईट ते काय. कॉंग्रेस ला तर लाज नव्हती ती आता भाजप कडे आहे कि नाही असा प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे.
या सरकार ने नको ते थेर काढण्यापेक्षा लोकांचे प्रश्न आणि समस्या कश्या मिटवता येतील याकडे विशेष लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे अन्यथा आगामी काळात शिवसेना अधिक आक्रमक होऊन भाजप विरोधात रान उठवेल कारण लोकशाही ने ज्यांना विरोधक केले आहे त्यांना विरोधात राहण्याची आणि विरोधकाची भूमिका माहीतच नाही कि काय असा प्रश्न पडतो नव्हे महारष्ट्रात विरोधक आहेत कि नाही असा प्रश्न पडतो. कारण विरोधकांची पोकळी निर्माण झाली आहे आणि विरोधक कुठेही दिसत नाहीत. एक महान नेते तर अजून क्रिकेट सोडायला तयार नाहीत हेच काल बारामती मधील कार्यक्रम यावरून दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेना आता अधिक अक्रमहोऊन तीपोकळी भरून काढेल आणि उद्याची समीकरणे यामध्ये बदल होऊन मित्र पक्षाचे मदतीने किंवा इतर छोट्या पक्षाच्या मदतीने पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल यासाठी प्रयत्न निश्चित करणार. तसेच आगामी काळात जर शिवसेना स्वबळावर मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तर राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात कारण शिवसेना पाठिंबा काढू शकते.
त्यामुळे भाजप ने नको त्या किंवा भलत्या मुद्द्यावर लक्ष ने देता शेतकऱ्यांचे आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊन उगीच भाष्कळ विधाने करू नयेत. कारण त्यांचे खरे देश प्रेम आता उघड झाले आहे. जेएनयु मध्ये त्यांनी देश विरोधी घोषणा दिल्याचाआरोप ठेऊन कन्हैया कुमार ला तात्काळ अटक केली होती. जो व्हीडीवो मिळाला तो खरा कि खोटा याची पडताळणी न करताच त्याला अटक केली मात्र तिकडे काश्मीर मध्ये "भारत माता कि जय " अश्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठीमार करण्यात आला. तिकडे भाजप आणि पीडीपी यांचे सरकार आहे त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी देशाच्या आणि प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि भाजप च्या आवडीच्या घोषणा दिल्या तर लाठीमार हि कोणती दुटप्पी भूमिका आणि हा कोणता विभाजित राष्ट्रवाद ?? का फक्त सोयीचा आणि राजकीय फायद्याचा राष्ट्रवाद हाच अजेंडा असेल तर येणारा काळ खडतर असणार आहे कारण सत्य जास्त दिवस लपून राहत नाही . आरएसएसचा अजेंडा जर भाजप ला राबवायचा असेल तर या देशात ते होऊ दिले जाणार नाही असेच काहीसे वातावरण तयार झाले आहे. पाहूयात पुढचा अंक कसा राहतो ते.....

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Thursday 31 March 2016

भाजप इज पार्टी विथ नो डीफरन्स....

पार्टी विथ नो डीफरन्स....

आमचाच पक्ष या देशात खूप वेगळा आणि चांगला आहे अशी शेखी भाजप सतत मिरवत राहायचा. या जनतेला ते आवडत होते कारण पक्षात सुशिक्षित आणि हुशार लोक होते. मात्र आता तो समज इतिहास जमा झाल्याचे दिसते. कारण जी बिरुदावली लाऊन भाजप हाकाट्या पिटायचा तोच किती फोल आहे हे मागच्या आठवड्यातील उदाहरणावरून दिसून येईल. ज्या पद्धतीने इतर पक्षात महिलानाचा अपमान करणारे तसेच त्यांचा विनय भंग करणारे महाभाग आहेत तसेच सध्या भाजप मध्ये गणेश पांडे यांचे रूपाने दिसत आहेत.
भाजप ने मागील काही वर्षापूर्वी औरंगाबाद , सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांनी महिलांची छेड काडली आणि काही ठिकाणी विनयभंग केला त्याविरोधात रान उठवले होते. त्याबद्दल खरे तर त्यांचे कौतुक करायला पाहिजे होते. मात्र आता तेच अनेक ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर स्पर्धा करताना दिसत आहेत. राजकारण या क्षेत्रात ती असती म्हणजे विविध ठिकाणच्या निवडणुकात असती तर ती समजून घेतली असती मात्र हि स्पर्धा चालू आहे ती राष्ट्रवादी मधील वाईट गुण घेण्याची दिसते. मुंबई येथे पक्षातील सहकारी महिलेचा विनयभंग केला म्हणून सध्या खूप चर्चेत असणारे गणेश पांडे यांचे बद्दल ज्या महिलेचा विनय भंग झाला आहे तिने तक्रार दाखल करून गणेश पांडे याचे अंडरवल्ड बरोबर संबंध असल्याचे सांगितले. गणेश पांडे हे आशिष शेलार यांचे खूप जवळचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इतर पक्षात जसे बेशिस्त आणि लबाड, गुंड नेते आणि कार्यकर्ते होते ते आता भाजप मध्ये सुधा मोठ्या संखेने आहेत त्यामुळे भाजप आता आता आपले स्लोगन बदलणार कि असे वाटते. नवा स्लोगन असा असला तर चांगले होईल "पार्टी विथ नो डीफरन्स" म्हणजे आता तर ते खूप वाचाळ आणि लबाड तसेच दिलेले शब्द पाळणारे नसून उलट दिशाभूल करत असल्याची लोकभावना आहे.
दुसरे एक उदाहरण पाहता येईल ते म्हणजे नागपूर येथे भाजप च्या युवा मोर्च्याच्या नेत्याने म्हणजे सुरजितसिंह ठाकूर याने प्राध्यापक म्हस्के यांना मारहाण तसेच त्यांची गाडी फोडल्याचे बातम्यात पाहिले होते. हा सत्तेचा माज आणि मस्ती इतरांना ५ ते १५ वर्षाच्या काळात आली आणि आता भाजप मध्ये ती फक्त १.५ वर्षाच्या काळात आली हाही बदल यांनी दाखवला. तसेच भाजप चे एक नेते ज्यांची बँकांनी आता त्यांचे संपत्तीवर जप्ती आणली असे बबनराव यांनी खरे तर श्रीगोंदा भागातील विजय मल्ल्या होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचे जवळपास २७५ कोटी रुपये थकबाकी मुळे कारखाना आणि इतर संपत्ती यावर टाच आणल्याचे वाचण्यात आले. आता मग प्रश्न पडतो कि नक्की भाजप नेमका इतर पक्षांपासून वेगळा कसा. भाजप मधील अश्या वागण्याने राज्यातील लोकांमान्ध्ये तीव्र नाराजी वाढताना दिसत आहे तसेच भाजप नेते आणि मंत्री यांचेविरोधात जनमत तयार होतानाही दिसत आहे.
त्यामुळे आता जे फाटायला लागले आहे ते त्वरित शिवून घ्यावे कारण जर योग्य वेळी त्याला शिलाई नाही केली तर आगामी काळात खूप फाटेल जे नंतर शिवता येणार नाही किंवा वेळ निघून गेलेली असेल...

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Friday 25 March 2016

"मेक इन इंडिया " कशाला मग "मेक इन हिंदुस्थान" का नाही ??

"मेक इन इंडिया " कशाला मग "मेक इन हिंदुस्थान" का नाही ??

आज फेसबुक वर संघ समर्थक लोकांनी केलेली एक पोस्ट पाहिली. पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले होते कि अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना अमेरिकी, जपान मध्ये राहणाऱ्या लोकांना जपानी, चीन मध्ये राहणारे चीनी त्या प्रमाणे हिंदुस्थान मध्ये राहणारे हिंदुस्थानी होते. व्वा काय पण फंडे आणि कसा प्रचार करतात हे लोक आणि स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवून घेतात आणि या राष्ट्राची धर्म, जाती यावरून शकले कसे करू शकतात हे लोक तेच समजत नाही.

जर हे या देशाला हिंदुस्थान म्हणत असतील तर मग ते मेक इन इंडिया कशाला राबवत आहेत त्या ऐवजी मेक इन हिंदुस्थान का राबविला नाही तसेही आता बहुमतातील आणि संघाच्या रिमोट वर चालणारे सरकार सत्तेत आहेच मग या कार्यक्रमाला सुधा मेक इन हिंदुस्थान नाव द्यायला काय हरकत होती का ??

या पवित्र भूमीचे नाव " भारत " आहे आणि कायम ते भारतच राहिले पाहिजे. याची धर्म आणि जातीच्या नावावर शकले किंवा नामांतर होता कामा नये. जर असा कोणी प्रयंत्न करेल तर तो सच्च्या देश भक्तांनी हाणून पाडला पाहिजे. या भूमीत जे लोक जन्मलेले आहेत तसेच देशाच्या विकास, जडणघडण करण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे त्या प्रत्येक "भारतीयजनाचा" या देशावर आणि साधन संपती वर तितकाच हक्क आहे त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या या पवित्र भूमीला कोणत्याही गुलामगिरीत जाऊच द्यायचे नाही मग ती परकीय असेल किंवा स्वकीय असेल.

देशातील सच्चे देशप्रेमी मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत यांनी आता संघटीत होऊन खोट्या प्रचाराच्या आधारावर या देशाचे नाव बदलवण्याचा ज्यांनी घाट घातला आहे त्यांना वेळीच आवरतील. तसेच ज्यांनी देशात भेदाभेद सुरु केला आहे अश्या धर्माच्या ठेकेदारांनी सुधा ध्यानात ठेवले पाहिजे तसेच ज्यांना देशाचा खोटा पुळका येतोय त्यांनी सुधा समजून घेतले पाहिजे कि आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येकावर प्रेम करा आणि प्रत्येकात मध्ये देश प्रेम जागृत करा कारण बेगडी राष्ट्र प्रेम आणि धर्म प्रेमातून तुम्हाला धार्मिक आणि राजकीय सत्ता यावर कायम पकड मिळवायची आहे हे आता लपून राहिले नाही. म्हणून अश्या प्रचाराला कोणी बळी पडू नका कारण आम्हाला हिंदुस्थान नव्हे तर आम्हाला आमचा " भारत" हाच देश पाहिजे जो आम्हाला प्राण प्रिय आहेच तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीद, हुतात्मा यांनी बलिदान दिले त्यांचा खर्या अर्थाने सन्मान असेल. म्हणून संघाने या देशात विनाकारण धार्मिक वाद निर्माण करून या देशाला यादवीकडे घेऊन जाऊ नये.

इथला प्रत्येक नागरिक हा देशावर प्रेम करतो आणि देशाची प्रगती तसेच इथल्या प्रत्येक व्यक्तीचा सर्व स्तरातील विकास झाला पाहिजे तसेच प्रत्येक जन माणूस म्हणून जगाला पाहिजे यासाठी आमच्या महापुरुष ज्यांनी न्याय, बंधुता, समता, सन्मान, एकात्मता या गोष्टीवर भर दिला पाहिजे.

आम्हाला भारतीयइजम हवा आहे ना कि धर्म किंवा जाती इजम हवा आहे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकामध्ये भारतीयत्व आणि भारतजन आम्हाला जागृत करायचा आहे. होय आम्हाला या देशाला महासत्ता झालेले पहायचे आहे आणि तो करण्यासाठी आम्हाला प्रयत्न सुधा करायचे आहेत. या देशाला सर्व क्षेत्रात अग्रसर करायचे आहे आणि त्यासाठी एकसंघ भावना असेल तरच सर्वांचा विकास शक्य आहे. मात्र जर धर्म आणि जाती यावरून जर वक्तव्य तसेच अजेंडे राबवणाऱ्या संघटना आक्रमक झाल्या तसेच सरकार त्यांना जर सहाय्य करणारे किंवा त्यांना पोषक वातावरण निर्माण करून देणारे असेल तर मग कशाची देशात एकता टिकेल आणि देश महासत्ता होईल मग ???

चला जागा करू प्रत्येकातला भारतीय, कायम राहू भारतीय, सन्मान वाढवू भारताचा, महासत्ता करू भारताला, ना करू दलित, मुस्लीम, बहुजन आम्ही सारे होऊ फक्त आणि फक्त भारतीयजन.....

जय भारत...

विजय गोफणे,
९४०४०८०००१

Friday 18 March 2016

दुष्काळी स्थितीत तरुणाला तारतेय शेळीपालन, शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय :

दुष्काळी स्थितीत तरुणाला तारतेय शेळीपालन, शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय

परिस्थिती माणसाला जगणं शिकवते. नेमके ध्येय ठेवून रस्ता पकडला, कामांची आखणी व कष्ट केले की यश फार लांब राहात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील अमोल जाधव या तरुणानं ५० शेळ्यांपासून पूरक व्यवसाय सुरू केला. तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थापन करीत २०० पर्यंत त्यांची संख्या वाढवली. आॅनलाइन पद्धतीने मार्केटिंग करीत शंभरपर्यंत शेळ्यांची विक्री केली. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जिल्ह्यात चिकाटीने या व्यवसायाला पोल्ट्रीची जोड देत अमोल यांनी आपल्या प्रयोगशीलतेचा नमुना पेश केला आहे..
सुदर्शन सुतार

बार्शी-कळंब रस्त्यावर हासेगावपासून चार किलोमीटरवर आत हावरगाव हे उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटंसं गाव. तेथील अमोल हा युवक जेमतेम दहावी शिकलेला. आई-वडील, दोन बहिणी असं कुटुंब. वडिलोपार्जित सात एकर शेती, पण पाण्याचा सतत दुष्काळ. विहीर, तीही हंगामी. वडील पारंपरिक शेतकरी. उत्पन्न आणि उत्पादनाचा मेळ कधीच बसला नाही.
ड्रायव्हर ते शेळीपालक अमोल

शेतीची प्रतिकूल स्थिती पाहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे व दोन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी यातून दहावीनंतरच अमोल पुण्यात खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरीला लागला. बहिणींची लग्ने कशीबशी उरकली. दोन-तीन वर्षे अशीच काढली. पण पुण्यात मिळणारा पगार आणि खर्च यांचा मेळ काही बसेना. अखेर गावच्या शेतीतच काहीतरी करावं असं त्यानं ठरवलं. काय करावं हा प्रश्‍न होताच. पण शोधणाऱ्याला सगळं सापडतं म्हणतात, तसंच अमोलबाबत झालं.

भाच्याच्या मदतीला आला मामा
केज तालुक्‍यातील युसूफ वडगाव या आपल्या गावी अमोलचे मामा महादेव निकम पोल्ट्री व्यवसाय करतात. साहजिकच अमोल यांनीही मामांना मदत करताना पोल्ट्री व्यवसायात लक्ष घालायला सुरवात केली. मामांनीच मग शेळीपालनाचा मार्ग दाखवला.

पाच लाख गुंतवले
शेळीपालन व्यवसाय अमोलच्या डोक्‍यात चांगलाच घुसला. त्याचा सुरू झाला त्यातील प्रवास.
-व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ६ महिने त्याचा अभ्यास
-पाच दिवसांचे प्रशिक्षण- पुणे येथे
-राज्यातील काही महत्त्वाचे शेळीपालन प्रकल्प अभ्यासले

शेळीपालनास सुरवात
-अद्ययावत बंदिस्त शेळीपालन शेड- १०० बाय ३२ फुटांचे. ठिकाण - हावरगावच्या शेतात.
-सुरवातीला मित्राच्या मदतीने ५० पिलांची खरेदी.
-गेल्या दीड ते पावणेदोन वर्षार्त शेळ्यांची संख्या पोचली- २०० पर्यंत.

मार्केटिंग, विक्री (मुख्यतः पैदासीसाठीच)
-आत्तापर्यंत २०० शेळ्यांची (नर-मादी मिळून) विक्री.
-दर (किलोचे)
शेळी- २५० रुपये (शेळीचे वजन- ४० किलो)
बोकड- २७५ रुपये (बोकडाचे वजन- ५० किलो)

आॅनलाइन विक्री
अमोल यांनी saigoatfarm.com ही वेबसाईट सुरू केली.
त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

नव्या पिढीकडे ॲंड्रॉईड मोबाईल व नेट कनेक्शन असल्याने आॅनलाइन पद्धतीच्या विक्रीची त्यांना सर्व माहिती आहे. त्याच आधारे विक्री करणे मला सुलभ झाले.
अमोल जाधव

अमोल म्हणाले
-उस्मानाबादी शेळीचे जातिवंत वाण पैदास करण्यावर भर देणार आहे. मुख्यतः ‘ब्रिडिंग’साठी शेळी पुरवण्याचा मनोदय आहे. त्यादृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे.
-बाजारात अनेक व्यापारी नगाप्रमाणे शेळी खरेदी करतात. मात्र त्या पद्धतीने आपल्याला शेळीची पुरेपूर किंमत मिळतेच असे नाही. म्हणून वजनावर विक्री हाच मार्ग फायद्याचा. त्यातून शेतकरी व ग्राहक दोघेही संतुष्ट होतात. मी त्यादृष्टीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची व्यवस्थाही केली आहे. .

मी उस्मानाबादी शेळीच का निवडली?
-ती कोणत्याही हवामानात राहू शकते.
-अतिशय काटक आहे.
-वर्षातून दोनदा वेत देते, प्रत्येकवेळी दोन पिले देते. एक शेळी तर चार पिले देणारी आहे.
-मटण चविष्ट असल्यान मागणीही चांगली.

छायाचित्रे
शेडची रचना
-चोहोबाजूंनी जाळी आणि वरती पत्रा.
-शेडचे चार स्वतंत्र भाग
-प्रत्येक भागात चारा आणि पाण्यासाठी स्वतंत्र गव्हाण, त्याद्वारे शेळ्यांना हवा तेव्हा खाद्य आणि पाणी घेता येते. बंदिस्त शेळीपालन असल्याने पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था जागेवरच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने.
-चारही भागांत फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा

-चारा
हिरवा-
अर्धा एकर
मेथी, तीन वर्षे कटिंग घेण्याजोगी
चारा पीक
-शेळ्यांच्या आवडीचे खाद्य असणाऱ्या शेवरीची बांधावर लागवड

वाळलेला
पावसाळ्यात जास्त उपलब्ध झालेल्या
चाऱ्याचे मूरघासमध्ये रूपांतर
(सायलो)(सुमारे २००० कडबा पेंढीची साठवण)
-
गरजेनुसार बाहेरून खाद्य आणले जाते. मात्र खर्च वाढविण्यापेक्षा शेतातच अधिकाधिक चारानिर्मितीचा प्रयत्न.

पाणी
-सहा बोअर, मात्र एकच चालते
-विहीर
-शेताला
-शेडमध्ये


शेतीवरही लक्ष
शेळीपालनातून मिळू लागलेल्या उत्पन्नामुळे अमोलचा शेतीतील उत्साहदेखील वाढला आहे. यंदा प्रत्येकी एक एकर ज्वारी व गहू, अर्धा एकर कांदा अशी पिके घेतली.

शेळ्यांवर घर चालतं का?
सुरवातीला वडिलांनी विरोध करीत शेळ्यांवर कुठं घर चालतं का? त्यातून आपलं कसं होणार अशी शंका व्यक्त केली. पण शांत वृत्तीच्या अमोल यांनी त्यांना धीर व विश्वासही दिला. कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही हे निश्‍चित केलं. अमोल यांच्या पत्नी सौ. ज्योती यांनीही चांगली साथ दिली. सरकारी पशुवैद्यक डॉ. नवनाथ सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळते. जोडीला अमोल मामांच्या गावी (सुमारे १५ किमी.) ३००० देशी पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसायही सांभाळतात. तेथे दर महिन्याला प्रति १००० पक्ष्यांची प्रति तीन महिन्यांची बॅच घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला पक्षी उपलब्ध होतात. किलोला सुमारे १५० रुपये दराने त्यांची विक्री होते.

- संपर्क - अमोल जाधव - ९६५७००३०००.