पार्टी विथ नो डीफरन्स....
आमचाच पक्ष या देशात खूप वेगळा आणि चांगला आहे अशी शेखी भाजप सतत मिरवत राहायचा. या जनतेला ते आवडत होते कारण पक्षात सुशिक्षित आणि हुशार लोक होते. मात्र आता तो समज इतिहास जमा झाल्याचे दिसते. कारण जी बिरुदावली लाऊन भाजप हाकाट्या पिटायचा तोच किती फोल आहे हे मागच्या आठवड्यातील उदाहरणावरून दिसून येईल. ज्या पद्धतीने इतर पक्षात महिलानाचा अपमान करणारे तसेच त्यांचा विनय भंग करणारे महाभाग आहेत तसेच सध्या भाजप मध्ये गणेश पांडे यांचे रूपाने दिसत आहेत.
भाजप ने मागील काही वर्षापूर्वी औरंगाबाद , सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांनी महिलांची छेड काडली आणि काही ठिकाणी विनयभंग केला त्याविरोधात रान उठवले होते. त्याबद्दल खरे तर त्यांचे कौतुक करायला पाहिजे होते. मात्र आता तेच अनेक ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर स्पर्धा करताना दिसत आहेत. राजकारण या क्षेत्रात ती असती म्हणजे विविध ठिकाणच्या निवडणुकात असती तर ती समजून घेतली असती मात्र हि स्पर्धा चालू आहे ती राष्ट्रवादी मधील वाईट गुण घेण्याची दिसते. मुंबई येथे पक्षातील सहकारी महिलेचा विनयभंग केला म्हणून सध्या खूप चर्चेत असणारे गणेश पांडे यांचे बद्दल ज्या महिलेचा विनय भंग झाला आहे तिने तक्रार दाखल करून गणेश पांडे याचे अंडरवल्ड बरोबर संबंध असल्याचे सांगितले. गणेश पांडे हे आशिष शेलार यांचे खूप जवळचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इतर पक्षात जसे बेशिस्त आणि लबाड, गुंड नेते आणि कार्यकर्ते होते ते आता भाजप मध्ये सुधा मोठ्या संखेने आहेत त्यामुळे भाजप आता आता आपले स्लोगन बदलणार कि असे वाटते. नवा स्लोगन असा असला तर चांगले होईल "पार्टी विथ नो डीफरन्स" म्हणजे आता तर ते खूप वाचाळ आणि लबाड तसेच दिलेले शब्द पाळणारे नसून उलट दिशाभूल करत असल्याची लोकभावना आहे.
दुसरे एक उदाहरण पाहता येईल ते म्हणजे नागपूर येथे भाजप च्या युवा मोर्च्याच्या नेत्याने म्हणजे सुरजितसिंह ठाकूर याने प्राध्यापक म्हस्के यांना मारहाण तसेच त्यांची गाडी फोडल्याचे बातम्यात पाहिले होते. हा सत्तेचा माज आणि मस्ती इतरांना ५ ते १५ वर्षाच्या काळात आली आणि आता भाजप मध्ये ती फक्त १.५ वर्षाच्या काळात आली हाही बदल यांनी दाखवला. तसेच भाजप चे एक नेते ज्यांची बँकांनी आता त्यांचे संपत्तीवर जप्ती आणली असे बबनराव यांनी खरे तर श्रीगोंदा भागातील विजय मल्ल्या होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचे जवळपास २७५ कोटी रुपये थकबाकी मुळे कारखाना आणि इतर संपत्ती यावर टाच आणल्याचे वाचण्यात आले. आता मग प्रश्न पडतो कि नक्की भाजप नेमका इतर पक्षांपासून वेगळा कसा. भाजप मधील अश्या वागण्याने राज्यातील लोकांमान्ध्ये तीव्र नाराजी वाढताना दिसत आहे तसेच भाजप नेते आणि मंत्री यांचेविरोधात जनमत तयार होतानाही दिसत आहे.
त्यामुळे आता जे फाटायला लागले आहे ते त्वरित शिवून घ्यावे कारण जर योग्य वेळी त्याला शिलाई नाही केली तर आगामी काळात खूप फाटेल जे नंतर शिवता येणार नाही किंवा वेळ निघून गेलेली असेल...
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१