Monday 8 August 2016

स्वयंम घोषित गोरक्षक हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत....

स्वयंम घोषित गोरक्षक हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत....
सरकार ने गो हत्या बंदी आणली आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्याचबरोबर गोरक्षक नावाची एक पिल्लावळ जन्माला आली. देशात आणि राज्यात गोरक्षक यांनी केलेले अत्याचार मग ती दलित यांना, मुस्लीम यांना केलेली मारहाण असो किंवा कोणाला मारले असेल अश्या घटना सगळीकडे वाढत असल्याचे दिसून आल्या. अनेक शेतकरी त्यांचेकडे भाकड झालेल्या किंवा वय झालेल्या किंवा दुष्काळामुळे स्वतःला जगणे मुश्कील झाले आहे ते आपली जनावरे विकत होते त्यांना सुद्धा त्रास झाला कारण कोणी गाई विकत घ्यायला तयार नाही. तसेच ज्यांचा गाई च्या कतली करून त्याचे मांस विक्री करणे हा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचे व्यवसायावर गंडांतर आले. म्हणजे एक भयंकर समस्या अनेक लोकांच्या पुढे उभी राहिली ती अनेकांचे पोट भरण्याचे साधन हिरावून घेतले गेले तर अनेकांना आपल्या गाई विकता येत नव्हत्या.
अनेक ठिकाणी गाई विकायला घेऊन जाणार्या शेतकरी, चालक किंवा ज्याला विकायला घेऊन जात आहेत त्यांना प्रचंड मारहाण किंवा अनेक ठिकाणी मारहाणीत मृत्यू झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा हल्लाबोल चालू होता त्यावेळी कोणाचे त्या प्रश्नाकडे लक्ष जात नव्हते. खुद्द प्रधानमंत्री सुद्धा या घटनांकडे लक्ष देत नव्हते. मात्र परवा त्यांनी वक्तव्य केले कि मला गोळ्या घाला पण दलित लोकांना मारू नका याबद्दल त्यांचे आभार जर त्यांचे म्हणणे खरे आणि आपल्या अन्त्कारनातून आले असेल तर नक्कीच आभार. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यात गोरक्षक फारच आक्रमक होत होते आणि त्या राज्यात घटना जास्त वाढत होत्या. प्रधानमंत्री म्हणाले त्याप्रमाणे ८०% गोरक्षक हे बोगस होते याचा नुकताच खुलासा झाला आहे. यामध्ये गोरक्षक नावाने गुंड लोक त्या गाड्या कडून हप्ते गोळा करायचे. त्या लोकांनी गुंड पाळले होते जे यांचेकडून पैसे वसूल करत होते. एका जनावरामागे २०० ते ३०० रुपये किंवा एका ट्रक मागे २०००० रुपये पर्यंत उकळत असत.
गोरक्षक नावाने वावरणारे मानवभक्षक नेमके काय करत होते ??? तर ते पैसे वसूल करत होते. मग गाई किंवा जनावरे भरून जाणारे ट्रक यांना कसा माहित असायचा हे माहित झाले तेंव्हा तर हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत हे नक्कीच झाले. जे गाई विकायचे ते हे गोरक्षक होते मग गाई विकल्या कि त्यांचे पाळलेल्या गुंडाकडून त्या ट्रकला आडवायला सांगून त्याकडून पैसे वसूल करत असत. जे देत नव्हते त्यांना मारहाण केली जायची तसेच या गोरख धंद्याला कवच म्हणून त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद याचे कवच घातले होते. आपल्या गोरक्ष धंद्या साठी दलित, हिंदू आणि मुस्लीम अशी उभी फुट पाडणारे हे धर्म मार्तंड आपल्या धंद्यासाठी आपण काय करत आहोत याचा विचार सुधा करत नाहीत. धर्मवेडे किंवा धर्मंद असणे त्या त्या देशासाठी किती धोकादायक असते ते पाकीस्थान , सिरीया यावरून दिसून येते. गोरक्षक हे ना धर्म प्रेमी आहेत किंवा गोवंश रक्षण करायचे आहे. त्यांना त्याचे आडून आपला धंदा वाढवायचा असल्याचे दिसते. खरच हे गोरक्षक होते तर त्यांनी मग शेतकरी आणि गरीब मजूर यांचेकडे भाकड झालेल्या गाई यांना स्वतः सांभाळायला हवे होते किंवा त्या गाई स्वतःकडे ठेऊन त्यांची चारा आणि पाणी याची व्यवस्था करायची होती, पण तसे होताना दिसत नाही. वस्तुतः कोणताही शेतकरी किंवा ज्याचेकडे गाई किंवा कोणतेही जनावर असेल तर ते खाटिक किंवा कोणाला विकायला मनावर फार मोठा दगड ठेऊन ते विकावे लागते कारण ते जनावर त्यांचे कुटुंबाचा एक भाग असते. पण स्वतः जगणे मुश्कील झालेला शेतकरी मग इलाज नसतो त्यावेळी पशुधन विकून टाकतो. मात्र अश्या बोगस गोरक्षक यामुळे शेतकरी, कामगार तसेच त्यावर ज्यांची पोटे चालत होती त्यांचे जगणे मुश्कील करून टाकले.
त्यामुळे आजूबाजूला अशे किती संधिसाधू आणि बोगस गोरक्षक आहेत हे तपासून पाहिले पाहिजे. तसेच त्यांना आता रोखले पाहिजे ते म्हणजे सर्व समाज व्यवस्थेने अन्यथा या देशात अशांतता माजल्या शिवाय राहणार नाही. तसेच जातीय, धार्मिक तेढ वाढवून हे महाभाग आपला धंदा अजून तेजीत आणतील. प्रधामंत्री यांचे म्हणणे त्यांनी आणि देशातील प्रत्येक राज्यातील सरकार यांनी अश्या भोंदू आणि बोगस गोरक्षक यांनी वेळीच रोखावे जेणेकरून देश जो भलत्याच दिशेला घेऊन जाणारे आणि मानवभक्षक असणारे उद्या देशात काय काय करून ठेवतील याची कल्पना देखील करता येत नाही. ( आज तक वर याचे स्टिंग झाले असून बोगस गोरक्षक यांची पोल खोल झाली आहे)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

No comments:

Post a Comment