छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्वाभिमान आहेत. तसेच त्या स्वराज्याची प्रेरणा आहेत. त्यांचेपासून प्रेरणा घेऊन अनेक युवक घडले आणि त्यांनी या महाराष्ट्र निर्मिती मध्ये योगदान दिले. शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि आपल्या सवंगडी मावळ्यासह ती प्रत्यक्षात उतरवली सुद्धा होती. ते एक महान आणि आदर्श राज्यकर्ते होते. पुढे त्यांचे कार्याचा वारसा हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर , बाजीराव पेशवे आणि राणोजी शिंदे यांनी समर्थपणे पेलला तसेच मराठी साम्राज्य हे संपूर्ण भारतभर वाढवले ते तलवारीच्या बळावर. प्रत्येक राज्यकर्त्याने मग शिवाजी महाराजानापासून प्रेरणा घेऊन मराठी गादी पुढे चालवली तसेच प्रजेला आपल्या पोरांप्रमाने जपले आणि त्यांची काळजी घेतली.
शिवाजी महाराजांवर मावळे जीव ओवाळून टाकत असे प्रसंगी आपला जीव देत असे कारण ते नेतृत्वगुण आणि स्वराज्य निर्मिती तसेच त्या काळातील मोघलाशाही किंवा इतर यांचे विरोधात लढा देणे तसे कठीण होते कारण सैन्य किंवा इतर युद्ध साहित्य यामध्ये शिवाजी महाराज त्यांचेपासून कोसो दूर होते. त्या काळात शिवाजी महाराज यांचे नातलग सुद्धा त्यांना वेढ्यात काढत होते. जे त्या मोघलांकडे चाकरी करत किंवा तिथे एखाद्या बड्या पदावर काम करत होते त्यांना शिवाजी महाराज यांचे उठाव असो किंवा स्वराज्य हि संकल्पना आणि शिवाजी महाराज हेच मुळात आवडत नसे. कारण त्यांना वाटत होते कि शिवाजी महाराज मोठे झाले तसेच राजे झाले तर आपले स्थान धोक्यात येईल म्हणून सतत त्यांना विरोध तसेच त्यांना मागे कसे खेचता येईल यासाठी जातीचे म्हणवणारे आणि नातलग म्हणवणारे कंबर कसून असत.
शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मुहुर्थ मेढ रोवली ती तोरणा किल्ला ताब्यात घेऊन. हा तोरणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांना मदत केली ती धनोजी धनगर यांनी. त्यांनी या किल्ल्यावर आक्रमण करण्याची योजना सांगितली तसेच महाराज्याना घोडे , गाई इत्यादी दिले तसेच स्वराज्य निर्मिती साठी आपले योगदान असावे असे सांगितले. धनोजी धनगर हे त्या किल्ल्यावर असल्यामुळे व तो किल्ला अनेक वर्ष त्यांनी सांभाळला असल्यामुळे त्यांना त्याची इथंभूत माहिती होती त्यामुळे किल्ला पटकन मिळवता आला आणि खर्या अर्थाने स्वराज्य निर्मितीला सुरुवात झाली मात्र स्वकीय नातेवाईक हे मात्र विरोधात होतेच.
शिवाजी महाराज यांचे प्रत्येक कार्याला आणि स्वराज्य या संकल्पनेला विरोध करणारे त्यांचे जातीचे आणि नातलग होते मात्र त्यांना साथ देणारे मावळे म्हणजे बारा बलुतेदार आणि अलुतेदार हेच होते . त्यामध्ये प्रत्येक जातीचे लोक सामावले होते. खरे तर शिवरायांच्या प्रत्येक मग कार्य असो किंवा संपती यांचे वारसदार तेच हवे होते मात्र तसे घडले नाही कारण शिवाजी महाराज एवढे मोठे कार्य करून गेल्यावर त्यांचे पश्चात त्यांचे रक्ताचे वारसदार हेच त्याचे मालक बनले. तसेच जे अगोदर मोघल दरबारी होते नंतर ते चांगभले करत तसेच शिवाजी महाराज यांचे नावाचा जयघोष करत आपली पोटे भरू लागली.
तेच देशाच्या स्वातंत्र्यनंतर सुद्धा घडले आणि घडत आहे. मधल्या काळात आपले राजकारण टिकावे आणि घट्ट राहावे यासाठी पद्धतशीरपणे शिवाजी महाराज यांची मांडणी तसेच अभ्यासक्रमात समावेश केला तसेच त्यांचे जातीय मांडणी आक्रमकपणे करून तसेच शिवाजी महाराज यांना मराठा या जातीशी जोडून त्यांचे नावाचा खोटा जयघोष करून राजकीय कट्टरता निर्माण करण्याचे कार्य या महाराष्ट्रात झाले. खरे तर शिवाजी महाराज यांचे कार्य आणि शिवाजी महाराज यांचेवर कसे आक्रमण होते गेले ते दिसून येते.
त्यांचे कार्य , त्यांच्या योजना , व्यवस्थापन , नियंत्रण , कल्याणकारी संकल्पना याचा मात्र राज्यात जास्त वापर केला नाही पण केवळ राजकारण यासाठीच शिवाजी महाराज यांचा अमर्यादित वापर होत गेला आणि शिवाजी महाराज यांचे कार्यापासून प्रेरणा घेणे दूरच राहिले उलट त्यांचे विचारांचे विरोधात हे राज्य ,राजकारण होत गेले आणि त्याचे परिणाम म्हणजे आज राज्यात शेतकरी आत्महत्या करताना तसेच बेरोजगारी , भ्रष्टाचार , महिलांवर अत्याचार , प्रचंड जातीयवाद , धार्मिक उन्माद, कायद्याचा धाक न राहणे आणि आर्थिक विषमता इत्यादी बोकाळत गेले . एकाच जातीचे शिवाजी महाराज यांचेवर हक्क दाखवणे तसेच त्यांचेवरील आक्रमण वेळीच थोपले पाहिजे अन्यथा एक चांगला राजा फक्त एका जातीपुरता आणि राजकारणात नाव घेण्यापुरता मर्यादित राहील ज्यामुळे या राज्याचे आणि देशाचे प्रचंड नुकसान होईल. शिवाजी महाराज हि प्रत्येकाची संपती आहेत , प्रत्येकाचा आदर्श आहेत आणि प्रत्येकाचा त्यांचेवर तेवढाच हक्क आहे कारण त्यांना स्वराज्य निर्मिती करताना साथ देणारे स्वार्थी नातलग नव्हते तर आमचे बलुतेदार आणि अलुतेदार लोकच होते तसेच त्यांनी शिवाजी महाराज यांना शेवट पर्यंत साथच दिली त्यामुळे सर्वांनी शिवाजी महाराज यांचेकडे आदर्श राज्यकर्ता म्हणून पाहिले पाहिजे. तसेच इतर राजे ज्यांनी महान कार्य केले आहे त्यामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर , बाजीराव पेशवे , राणोजी शिंदे , महाराजा यशवंतराव होळकर , महाराणा प्रताप , संभाजी राजे इत्यादींना सुद्धा सर्व समाज घटकांनी आपले मानले पाहिजे आणि त्यांचे सुद्धा कार्याची आठवण काढली पाहिजे हे मुद्दाम नमूद करावेशे वाटते कारण आपण यांचे कार्य आणि यांना विसरून गेलो आहोत कारण त्यांचे उदो उदो करून राजकारण करता येत नाही म्हणून कि काय हेच समजत नाही.
जर खरच महाराष्ट्र पुरोगामी करायचा असेल तर सर्वांना स्वीकारायला शिकले पाहिजे , सर्वाना सहभागी करून घेता आले पाहिजे आणि प्रत्येक जाती समूहाला प्रतिनिधित्व , सामाजिक सहभाग तसेच सर्वाना बरोबर घेणारे राज्यकर्ते निर्माण झाले तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नक्कीच निर्माण होईल ...