Tuesday 26 April 2016

नागराज मंजुळे यांचा "सैराट" चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार....

नागराज मंजुळे यांचा "सैराट" चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार....

खरे तर नागराज मंजुळे हे ग्रामीण भागातील दिग्दर्शक आहेत ज्यांना चित्रपट या क्षेत्रातील कोणताही वारसा नव्हता. त्यांनी पाठीमागे जे काही चित्रपट तयार केले त्यामध्ये ग्रामीण जीवनातील अंतरंग तसेच वास्तव परखड पणे मांडले आहे. या मध्ये मग पिस्तुल्या, फैन्द्री यासारखे उत्तम चित्रपट देऊन समाज व्यवस्थेमधील ग्रामीण भागातील जातीय वास्तव तसेच मानवी मनाने केलेले प्रेम याला गावात काय मिळते हे दाखवले आहे.
नागराज ने अनेक चित्रपटातून या व्यवस्थेला जी चपराक दिलेली आहे त्यामधून या व्यवस्थेमध्ये बदल व्हावेत असी त्याची कामना आहे. नागराज चा चित्रपट असतो तो काहीतरी वेगळे घेऊन येणारा. तो स्वतः कथा लिहितो आणि त्यामध्ये वास्तव असणारे तसेच ग्रामीण जीवनात घडणारे किंवा अनुभवलेले वास्तव अधिक ठळक असते. आता येणारा सैराट सुधा नव्या दमाचा नवा सिनेमा ज्या मध्ये नेहमी प्रमाणे ज्या अभिनेता किंवा अभिनेत्री यांची कोणालाही ओळख नाही अश्या नव्या दमाच्या जोडीला जी ग्रामीण भागातील आहे ती म्हणजे ठोसर आणि रिंकू राजगुरू तसेच फैन्द्री मधील झब्या आणि डब्या आहेत या चित्रपटामध्ये ज्या मध्ये प्रेमकथा आहेच पण सामाजिक जीवनातील गावातील अनेक संघर्ष, जात आणि इतर बाबी मस्त गुंफल्या आहेत . खरे तर महेश मांजरेकर मध्ये म्हणाले होते कि मराठी चित्रपटाला मिळणारे अनुदान बंद करावे कदाचित त्यामागील हेही कारण असू शकते कि नागराज सारखे दिग्दर्शक जे ग्रामीण भागातील असून चांगले चित्रपट तयार करून त्यांना स्पर्धा करू लागलेत त्यामुळे कदाचित त्यांचे मार्ग बंद करावेत हा केविलवाणा प्रयत्न असू शकतो. पण तसे काही होईल असे वाटत नाही कारण गुणवत्ता असलेले लोक कितीही आणि काहीही केले तरी पुढे जाणार.
अजय-अतुल या जोडीचे संगीत याला लाभले असून अतिशय सुंदर आणि ठेका धरायला लावणारी गाणी आहेत. तसेच विशेष म्हणजे हॉलीवूड चे संगीत यामधील गाण्याला हॉलीवूड मध्ये जाऊन घेतले आहे. जे कि मराठी म्हणा किंवा आतापर्यंत कोणत्याही चित्रपट मध्ये झाले नव्हते. तसेच नागराज याचे विशेष अभिनंदन कि ग्रामीण भागात दडलेले कलाकार शोधून ते आणि त्यांची कला सर्वांसमोर आणत आहे तसेच कलाकार हा कोणत्याही एकाच जातीत जन्माला येत नाही तर कलेला जात नसते आणि कलाकार शहरातच जन्माला येतो त्यालाही छेद देत करमाळा जिल्हा सोलापूर भागातील कलाकार निवडून चित्रपट हा सर्वांसाठीचे मनोरंजन आणि प्रबोधन याचे मध्यम असल्याचे या चित्रपटातील संदेशाने अधोरेखित होते. तरी सर्वांनी नक्कीच आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन सैराट हा चित्रपट पहावा आणि सैराट व्हावे.....
नागराज मंजुळे यांना या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच आगामी काळात चांगल्या कलाकृती जन्माला घालोत याही शुभेच्छा.......

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१
vijaygophaneblogspot.com
vijay.gophane@gmail.com

Friday 22 April 2016

देशातील मिडीयाला अजून शहाणपण कधी येणार ??

देशातील मिडीयाला अजून शहाणपण कधी येणार ??
आपला मिडिया ज्यामध्ये खासकरून काही बातम्या देणारे न्यूज चैनल अजून किती बालीशपणा करतात तेच दिसून येते. एकतर चैनल वाले तयार होऊन झालेत १२ ते वर्ष. जर मानवी वयाच्या आणि समाज याबातीत बोलायचे झाले तर अगदी लहान बाळाचे वय जसे असते तसे इथल्या न्यूज मिडियाचे वय आहे. हा बालीशपणा अनेक प्रकरणातून आणि प्रसंगातून तसेच त्यांनी दाखवलेल्या बातम्यातून दिसून येईल. या देशातील संरक्षण विषय बाबींना हात घालून सगळे उघडे करून इतर शत्रू देशांना याचा फायदा होईल याचा विचार न करता माहिती देणारा इथला मिडिया. तसेच देशात जेंव्हा मुंबई मध्ये अतेरिकी हल्ला झाला होता त्यावेळी थेट प्रक्षेपण दाखवून शत्रूला आपली रणनीती बदल करायला आणि हल्ले करायला जणू मदत करत होते के काय असा प्रश्न पडत होता.
आजही मिडिया आपल्या वागण्यात काहीच बदल करण्यास तयार नाही असे वातावरण दिसते. या देशात अनेक महत्वाच्या समस्या असताना हे पैसे घेऊन कशाला जास्त दाखवतील याचा काही नेम नाही. जर आपण नीट पाहिले तर भांडवलदारांचा हस्तक किंवा त्यांचीच पिल्लावळ असलेला हा मिडिया या देशातील वातावरण असहिष्णू करण्यास तितकाच जबादार आहे. बातमी च्या नावाखाली काहीही दाखवत असतात हे लोक. मागे राष्ट्रभक्ती यावर अनेक दिवस चर्चा घडवून आणि त्यामधून जाती आणि धर्मात वाद लावून दिले होते. तर धर्म हेतर कायम यांना वाद लावून त्याचे प्रक्षेपण करणे आणि लोकांना दुसरा कोणताही विचार करू द्यायचा नाही हे यांनी पक्के ठरवून घेतले आहे. (काही चैनल चांगले असतील पण खूप कमी आहेत)
आजच्या घडीला देशात जर पाहिले तर लोकांची मने तयार करणे किंवा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे कार्य हाच मिडिया करतो. त्यामुळे मिडिया माणसाला चालवायला लागल्याचे चित्र दिसते. यामुळे माणूस स्वतः जास्त विचार करत नाही आणि तो या मिडिया च्या भरोश्यावर विसंबून राहतो. नेमका याचाच फायदा उचलला जातो आणि दलाल निर्माण होऊन भांडवलदारांचे हित साधले जात असल्याचे दिसते. चांगले काम करणारे लोक असतील किंवा नेते असतील किंवा विषय असतील किंवा खर्या समस्या असतील इकडे हे फारसे लक्ष देत नाहीत मात्र या देशात मशीहा निर्माण किंवा जन्माला घालायचे काम हा इथला मिडिया करत आहे. लोकशाहीचा हा चौथा स्थंभ नक्की योग्य काम करतो आहे किंवा नाही याबाबत त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच वेळ आलेली आहे. कोणाची तरी तळी उचलून आणि त्याला प्रचंड प्रसिद्ध करायचे आणि चांगल्या लोकंकडे दुर्लक्ष्य करायचे हे एक यांचे षड्यंत्र आहे.
समाजात जागृती करून लोकशाही आणि मानवी मूल्य यांना बळकट करणे गरजेचे असताना हा मिडिया नेमके याचे उलट काम करताना दिसतो. या मिडिया इथल्या समाज व्यवस्थेमधील अनेक अश्या जमाती आहेत ज्यांच्या समस्या भयंकर आहेत तिकडे लक्ष्य द्यायला अजिबात वेळ नाही. तसेच हे लोक अंधश्रद्धा पसरवण्यास सुधा मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. धार्मिक आणि दैवी गोष्टीना खतपाणी घालून लोकांचा बुद्धिभेद केला जातो तसेच लोकांना मानसिक गुलाम करायचे काम इथला मिडिया करत असतो. मिडिया काही वर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो मात्र आता सोशल मिडिया मुळे लोकांच्या काही वेदना आणि समस्या तसेच काही वास्तव समोर येते तसेच स्वस्तात मिळणारा हा मिडिया आहे. मात्र यावर सुधा अनेक मेसेज जसे कि हा मेसेज पुढे २१ लोकांना पाठवा लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि आमचे पण भयाड लोक लगेच पाठवतात पुढे घंटा चांगली बातमी येत नाही आणिनंतर देतात नशिबाला दोष. मिडिया हा देशातील प्रत्येक घटकांचे प्रश्न मांडणारा, प्रत्येकाचा प्रतिनिधी म्हणून असला पाहिजे जो देशात विभागणी न करता उलट एकता आणि एकात्मता वाढेल तसेच सत्ताधारी पक्षावर दबाव निर्माण करेल तसेच देशात घडणाऱ्या चांगल्या आणि सकारात्मक बाबींना पुढे आणून देशाची प्रगती होईल याकडे लक्ष देईल.
अनेक मिडिया चैनल वर काही कार्यक्रम असतात त्यापैकी डिबेट हा एक कार्यक्रम असतो ज्यामध्ये विविध पक्ष आणि संघटना यामध्ये कोंबड्याची झुंज जशी लावली जाते तशी इथे लावून दिली जाते. या देशातील व्यवस्था परिवर्तन झाले पाहिजे आणि जुन्या चुकीच्या बाबी बंद झाल्या पाहिजेत यासाठी मात्र जास्त प्रमाणात हे लोक काम करत नाहीत. यांनी किमान आता तरी बालीशपण सोडून देऊन चांगले कार्य हाती घ्यावे. मिडीयाने अगोदर स्वतः काही कोड ऑफ कंडक्ट घालून घ्यावा आणि तेंव्हाच दुसर्याला नितीमुल्य शिकवावी अन्यथा दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशे म्हणावे लागेल......

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Wednesday 6 April 2016

आयपीएल महत्वाचे आहे कि लोकांना पिण्याचे पाणी ?? भाजप चा मुखवटा नेमका कोणता आहे??

आयपीएल महत्वाचे आहे कि लोकांना पिण्याचे पाणी ?? भाजप चा मुखवटा नेमका कोणता आहे??

एकतर महाराष्ट्रात १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ पडला असताना ४० लाख लिटर पाण्याची फुकट उधळपट्टी होणार आहे. इकडे मराठवाडा आणि विदर्भातील , पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे दुष्काळामुळे होरपळून निघत आहेत मात्र चंगळवादी लोक जे भारतात राहत नाहीत तर इंडिया मध्ये राहतात त्यांना याचे काहीच सोयर सुतक नसावे यापेक्षा काय वाईट ते. दिवाळी मध्ये जर एखाद्याच्या शेजारील घरात जर मयत झाले असेल आणि आपण त्याचे घरात झाले आहे माझ्या नाही म्हणून खुशाल फटाके वाजवणार असो तर आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत असेच म्हणावे लागेल. त्यांचे दुखात जर सामील होता आले नाही तर किमान त्यांचे जखमांवर मिट तरी चोळू नये. जर एवढाच पैशाचा माज असेल तर विकत आणावे पाणी ३ रुपया लिटर ने दुसऱ्या राज्यातून किंवा इतर ठिकाणी मिळेल तिथून.
जर या वेळचे सामने जर दुसऱ्या राज्यात भरवले तर खूपच चांगले होईल ज्या राज्यात पाण्याची चांगली व्यवस्था आहे. मात्र अश्या ठिकाणी कॉंग्रेस चे शुक्ला आणि भाजपच्या मंडळी सगळा विरोध विसरून बरे एक होतात. या राज्यात दुष्काळ आणि नापिकी मुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत तर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत त्यांना मदतीसाठी पुढे येणारे किती जन आहेत. आमचे मुख्यमंत्री तर " भारत माता कि जय" म्हणण्यात दंग आहेत मात्र या भारत भूमीच्या शेतकरी राजाला आत्महत्या करावी लागतेय तिकडे लक्ष्य द्यायचे आणि त्यांची तहान कशी भागेल यावर लक्ष्य देण्या ऐवजी सगळ्यांचे लक्ष भलतीकडेच वळवत आहेत यासारखे वाईट ते काय. कॉंग्रेस ला तर लाज नव्हती ती आता भाजप कडे आहे कि नाही असा प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे.
या सरकार ने नको ते थेर काढण्यापेक्षा लोकांचे प्रश्न आणि समस्या कश्या मिटवता येतील याकडे विशेष लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे अन्यथा आगामी काळात शिवसेना अधिक आक्रमक होऊन भाजप विरोधात रान उठवेल कारण लोकशाही ने ज्यांना विरोधक केले आहे त्यांना विरोधात राहण्याची आणि विरोधकाची भूमिका माहीतच नाही कि काय असा प्रश्न पडतो नव्हे महारष्ट्रात विरोधक आहेत कि नाही असा प्रश्न पडतो. कारण विरोधकांची पोकळी निर्माण झाली आहे आणि विरोधक कुठेही दिसत नाहीत. एक महान नेते तर अजून क्रिकेट सोडायला तयार नाहीत हेच काल बारामती मधील कार्यक्रम यावरून दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेना आता अधिक अक्रमहोऊन तीपोकळी भरून काढेल आणि उद्याची समीकरणे यामध्ये बदल होऊन मित्र पक्षाचे मदतीने किंवा इतर छोट्या पक्षाच्या मदतीने पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल यासाठी प्रयत्न निश्चित करणार. तसेच आगामी काळात जर शिवसेना स्वबळावर मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तर राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात कारण शिवसेना पाठिंबा काढू शकते.
त्यामुळे भाजप ने नको त्या किंवा भलत्या मुद्द्यावर लक्ष ने देता शेतकऱ्यांचे आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊन उगीच भाष्कळ विधाने करू नयेत. कारण त्यांचे खरे देश प्रेम आता उघड झाले आहे. जेएनयु मध्ये त्यांनी देश विरोधी घोषणा दिल्याचाआरोप ठेऊन कन्हैया कुमार ला तात्काळ अटक केली होती. जो व्हीडीवो मिळाला तो खरा कि खोटा याची पडताळणी न करताच त्याला अटक केली मात्र तिकडे काश्मीर मध्ये "भारत माता कि जय " अश्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठीमार करण्यात आला. तिकडे भाजप आणि पीडीपी यांचे सरकार आहे त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी देशाच्या आणि प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि भाजप च्या आवडीच्या घोषणा दिल्या तर लाठीमार हि कोणती दुटप्पी भूमिका आणि हा कोणता विभाजित राष्ट्रवाद ?? का फक्त सोयीचा आणि राजकीय फायद्याचा राष्ट्रवाद हाच अजेंडा असेल तर येणारा काळ खडतर असणार आहे कारण सत्य जास्त दिवस लपून राहत नाही . आरएसएसचा अजेंडा जर भाजप ला राबवायचा असेल तर या देशात ते होऊ दिले जाणार नाही असेच काहीसे वातावरण तयार झाले आहे. पाहूयात पुढचा अंक कसा राहतो ते.....

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१