Monday, 22 February 2016

दुष्काळामुळे सामाजिक जीवन उद्वस्त होत चालले आहे याकडे कोण लक्ष देणार का ??

बीड मध्ये २५ युवती यांनी घेतला लग्न न करण्याचा निर्णय :

दुष्काळामुळे सामाजिक जीवनच उध्वस्त होत चालले असल्याचे बीड मध्ये दिसून आले आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आणि उग्र झाला आहे. याच जिल्ह्यात ३०१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत जे कि नक्कीच भूषण नाही. जिल्ह्यातील पाचोळा आणि माजलगाव भागातील अनेक तांड्यावर भीषण पाणीटंचाई आहे त्यामुळे मेंढपाळ, पशुपालक यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.

हि सगळी भयावह परिस्थिती पाहून तसेच अनेक मुलींच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्या आहेत तसेच कर्जाला कंटाळून जीवन संपवले आहे. अश्या भीषण परिस्थिती मध्ये पाचोळा आणि माजलगाव भागातील २५ युवती लग्न करणार नाहीत अशी त्यांनी घोषणा केल्याचे वाचनात आले. तसेच त्यांनी हा निर्णय आपल्या पालकांना सुधा कळवला आहे.

दुष्काळाची धग किती भयानक आहे आणि सामाजिक जीवनात गरीब, शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, कामगार यांना याचे किती चटके बसत असतील हे संवेदनशील लोक नक्की समजून घेतील का?? सहकार्य आणि मदत करून त्यांना या भीषण दुष्काळ आणि दारिद्र्यातून सरकार तसेच इथले राज्यकर्ते बाहेर काढतील का??

चला आपण सगळे जन सामाजिक जाणीवेतून हा प्रश्न सरकार पर्यंत पोहचवू तसेच हुंडा बंदी, सामुदायिक विवाह सोहळे, दुष्काळी भागातील शिक्षण मोफत कसे करता येईल याचे पर्याय सुचवू आणि सरकार नावाची निर्जीव वास्तूला हलवून जागे करूयात.....

सरकार नेच पुढाकार घेऊन कन्यादान करावे ( सामुदायिक विवाह सोहळे तालुका, जिल्हा पातळीवर आयोजित करून गरिबांचे कल्याण करावे) तसेच सामाजिक जीवन सुरळीत करण्यासाठी निकराने प्रयत्न करावेत.तसेच राज्यातील सर्व पक्षांचे नेते, पुढारी हे सुधा असे मेळावे आणि उपक्रम घेतील का जेणेकरून लोकांना जगणे शक्य होईल????

आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहचवाल ....

No comments:

Post a Comment