Thursday, 3 March 2016

कोणत्याही टोकाच्या विचारसरणी देशाला घातकच

कोणत्याही टोकाच्या विचारसरणी देशाला घातकच ......

देशामध्ये अनेक विचारसरणी आहेत आजमितीला. अतिशय चांगली गोष्ठ आहे हि कि विचार करण्याची किंवा बुद्धीचा वापर ( विचारसरणीला बुद्धीची गरज असते) करण्याची मुभा आहे. मुळात ज्या अनेक विचारसरणी ज्यांचे नावाने असतील जसे कि मार्क्स , लेनिन, फुलेवाद, आंबेडकरवाद, पेरीयारवाद, संघवाद , डाव्या , उजव्या इत्यादी अनेक विचारसरणी आहेत. मात्र कोणतीही विचारसरणी हि शाश्वत नसत तर कालानुरूप तिच्यामध्ये काही बदल होतात किंवा त्यामध्ये आणखी माहिती सामाविस्ट करावी लागते.

जिच्या मध्ये असे बदल घडत नाहीत किंवा बदलास सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत त्या विचारसरणी पाठीमागे पडतात. त्यामुळे फक्त तेच विचार किंवा तत्वज्ञान अगदी बरोबर आहे आणि नवीन चुकीचे आहे म्हणून टोकदार वागणे किंवा त्या विचारसरणीचा टोकाचा प्रचार आणि प्रसार करणे हे देशासाठी नक्कीच घातक आहे. आपल्या देशात नेमके तेच घडत आहे असे वाटते कारण प्रत्येक जन नाव त्या विचारसरणी असलेल्या नेत्याचे घेतो आहे आणि अगदी टोकाची रेटा रेटी चालू आहे. यामध्ये संघ आघाडीवर होता आता त्याचे जोडीला डाव्या संघटना आणि इतर विचारसरणी टोकाचे विचार आणि प्रतिक्रिया देताना दिसतात. देशातील वातावरण यामुळे बदलत असून अनेक संघटना आणि संस्था या सध्याच्या सरकार विरोधात दंड थोपटून उभ्या आहेत. या साठी सरकार सुद्धा तेवढेच जबाबदार आहे.

कारण नसताना अनेक ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत आहे जसे कि जेएनयु असेल , किंवा एफटीआई, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी जास्तच हस्तक्षेप आणि तानातानी झालेली आहे. त्यामुळे मृत अवस्थेत चाललेले विरोधी पक्ष, संघटना तसेच देशाला घातक असणाऱ्या शक्ती यांना पोषक आणि पूरक वातावरण आयतेच सरकार ने निर्माण करून दिले आहे. मुळात अनेक देशात क्रांती झाल्या त्या क्रांतीचे शिलेदार किंवा विचारप्रणालीचे निर्माते यांनी त्याकाळात आवश्यक त्या विचारसरणी तयार केल्या. मात्र आमचे बरेच लोक त्यांचे चळवळी, आंदोलने किंवा तत्वज्ञान पाहून आले आणि आपल्या देशात जसेच्या तसे वापरू पहात आहेत. मुळात आपल्या देशात सुद्धा चांगले विचारवंत किंवा तत्वज्ञान तसेच चळवळ साठी पूरक विचार निर्माण करून गेलेले महापुरुष आहेत पण आमची मानसिक गुलामी काही केल्या संपत नाही हे यावरून दिसून येते. आमचेकडे सुद्धा अनेक विचारवंत आणि तत्वज्ञ होऊन गेले यांचे विचार किंवा तत्वज्ञान यावर काम करणाऱ्या संघटना का नाहीत.

देशात होऊन गेलेले अनेक संत , तत्वज्ञ जसे कि फुले , पेरियार, आंबेडकर, शाहू सह अनेकांनी अतिशय चांगले , उपयुक्त आणि देशी तत्वज्ञान दिलेले असताना तसेच या संत आणि तत्वज्ञानी लोकांना इथल्या समाजाने बहिष्कृत, किंवा छळ, किंवा कपटाने मारले असताना आणि चांगले तत्वज्ञान दिलेले असताना आम्हाला ते का नको आहे आणि परदेशी का हवे आहे आणि तेही टोकाचे का हवे आहे तेच कळायला मार्ग नाही. काही कालखंड असतो ज्या काळात काही विचारसरणीला पोषक वातावरण निर्माण होते कारण त्याला सहाय्यभूत सरकार येते त्यावेळी ती विचारसरणी वाढते किंवा त्या विचारसरणीला मानणारे सरकार अतिरेक करू लागले तर त्या विचारसरणी विरोधात उठाव होऊ लागतो ज्यामुळे सरकार आणि त्या विचारसरणीला ब्रेक लागतो.

त्यामुळे अनेक विचारसरणी असल्या पाहिजेत पण टोकाच्या जरूर नसाव्यात.
ज्यामुळे देश्याबाहेरून देशाच्या विरोधात काम करणाऱ्या तसेच देश विघटन करू इच्छिणार्या शक्तींना बळ येऊन त्या त्यांचे इच्छित कार्य देशात करू शकतील. त्यामुळे वैचारिक वाद आणि संवाद देशात चालू राहतील पण ते टोकाचे नसावेत जेणेकरून बाह्य शक्ती याचा फायदा घेऊन देशात अस्थिर वातावरण किंवा देशाचे नुकसान करतील.

देशाला आता गरज आहे एका नव्या विचारसरणी , तत्वज्ञान यांची ज्यामुळे देश हा सर्वांना आपला वाटेल आणि ज्यामध्ये सर्वांचा विकास, सर्वांचे भले आणि कल्याण , समता , ज्ञाय, बंधुता , राष्ट्रप्रेम इत्यादी मुल्यांचा अंगीकार केला पाहिजे.

( गरज आहे भारतीयवाद किंवा बहुजन नव्हे तर भारतजन म्हणायचे वेळ आली
आहे असे वाटते)


जय भारत

No comments:

Post a Comment