Tuesday, 15 March 2016

श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...

आज १६ मार्च रोजी श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांची जयंती आहे त्याबद्दल सर्व देशवाशियाना खूप खूप शुभेच्छा.

अनेकांना आपला हा महापराक्रमी योध्दा अद्याप माहित नाही कारण इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात ते आपल्याला सापडत नाही. पण कितीही काही झाले तरी आता त्यांचा इतिहास समोर येत आहे आणि त्यांचे ते महापराक्रमी व्यक्तिमत्व माहित होत आहे. या ठिकाणी म्हणून आज त्यांचे कार्याचा थोडासा परिचय द्यावासा वाटतो तसेच त्यांचे महापराक्रम आणि गाजवलेल्या शौर्याला सलाम करावासा वाटतो.

आपल्या देशाचा इतिहास जर पाहिला तर अनेक राजांनी आपल्या देशावर आक्रमण केली तसेच या देशाला लुटले. या देशात सोन्याचे प्रचंड साठे आणि मुबलक साधन संपती असल्याने अनेक राजे जसे कि सिकंदर, अब्दाली इत्यादीसह अनेकांनी देशावर लुटीसाठी आक्रमणे केली. मात्र आपल्या देशातील कोणत्याही राजाने आपल्या देशातील राज्यांना लुटण्याव्यतिरिक्त बाहेर कोणत्याही देशावर आक्रमण किंवा लुट केली नाही.

श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी मात्र मध्य आशियातील अफगाणिस्थान जिकडे गीलचे आणि पठाण (अब्दाली त्या भागातील होता) यांचे प्रदेशात आक्रमण करून लुट केली होती. यामध्ये आज महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे " अटकेपार झेंडे रोवणे" ती आहे कोणतेही यश मिळवले कि त्याची तुलना अटकेपार झेंडे रोवले म्हणून केली जाते. अटकेपार झेंडे रोवले ते महापराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनीच. या मोहिमेत त्यांचेबरोबर होते तुकोजीराजे होळकर (प्रथम) अटक या शहरात घुसून प्रचंड लुट आणि आक्रमण तसेच शौर्य गाजवले ते यांनीच. हे आक्रमण एवढे रौद्र आणि भयानक होते कि नंतर तिकडे कोणी "मल्हार आया है" असे म्हणाले तरी लोक गावेच्या गावे सोडून जात व भीतीची प्रचंड दहशत निर्माण झाली होती आणि शत्रूला सुद्धा जाम केले होते.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहुर्थ मेढ रोवली या महाराष्ट्रात. त्याच महाराष्ट्राच्या कर्तुत्ववान भूमीत फलटण तालुक्यातील होळ मुरूम येथे साध्या मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि ज्यांचे वडील यांचे वय ३ वर्षाचे असताना सोडून गेले होते. या श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी महान पराक्रम आणि तलवार गाजवून मराठेशाही ची पताका खांद्यावर घेऊन आणि खंडोबाची आराधना करून मराठी साम्र्ज्याची इमारत आणि कळस निर्माण करण्याचे महान कार्य केले तसेच उत्तरेसह संपूर्ण भारतभर मराठी साम्राज्य घेऊन गेले. वयाच्या १५ व्या वर्षापासून हातात तलवार घेऊन लढणारे श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी वयाच्या ७१ वर्षापर्यंत म्हणजे पूर्ण हयात रणांगणावर घालवली होती. या हजारो लढाया आणि अगणित युद्ध तेही सपाट प्रदेशात " गनिमी काव्याने" लढणारे महान योद्धे होते. गनिमी कावा हा खरे तर सम्राट चंद्र गुप्त मौर्य यांनी शोधला आणि पुढे त्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी वापर करून आपले युद्ध कौशल्य धाखावले आणि अनेक योद्धे जिंकली.

आज अश्या या महापराक्रमी राज्याला ज्याची इतिहासाने दखल घेतली नाही त्यांचे शौर्यास आणि कार्यास सलाम तसेच सर्व देश बांधवाना त्यांचे जयंती निमित्य कोटी कोटी शुभेच्छा...आज ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी जर इतिहास लिहिला असता तर खरा इतिहास आमच्यापुढे आला असता आणि त्याचेपासून प्रेरणा घेऊन नव्या पिढ्या इतिहास घडवायला तयार झाल्या असत्या.........

जय मल्हार.... जय भारत....

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

No comments:

Post a Comment